महाराष्ट्र

चारित्र्यावर संशयातून विवाहितेला जाळून केले ठार; पती-सासऱ्याची जन्मठेप उच्च न्यायालयाकडून कायम

नागपूर: चारित्र्यावर संशय घेत विवाहितेला अमानुष मारहाण करून रॉकेल टाकून जाळून ठार केल्याप्रकरणी पती व सासऱ्याला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. घटनेची क्रूरता आणि उपलब्ध पुरावे लक्षात घेता न्यायालयाने दोघांचेही अपील फेटाळून लावले.

अमोल देशमुख (वय २८) आणि विजय देशमुख (वय ५३) अशी आरोपींची नावे असून ते यवतमाळ जिल्ह्यातील पोफळी, ता. उमरखेड येथील रहिवासी आहेत. मृत विवाहितेचे नाव छाया असे आहे. छायाचा २००९ मध्ये अमोल देशमुखसोबत विवाह झाला होता. सुरुवातीला दोन वर्षे छायाला चांगले वागवण्यात आले; मात्र त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेत आरोपींनी तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला.

१५ सप्टेंबर २०१२ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी छायाची हत्या करण्याच्या उद्देशाने आधी तिची बेदम मारहाण केली. त्यानंतर तिचा गळा दाबून रॉकेल टाकून आग लावली. छाया स्वतःला वाचविण्यासाठी प्रतिकार करत होती. या झटापटीत आरोपींचे कपडेही रॉकेलने ओले झाल्याचे तपासात समोर आले.

या प्रकरणात सत्र न्यायालयाने २ मार्च २०२१ रोजी दोन्ही आरोपींना हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरवत जन्मठेप व प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावला होता. दंड न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने प्रकरणातील पुरावे व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींचे अपील फेटाळून लावत सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

2 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

2 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

2 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

2 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

2 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

2 तास ago