महाराष्ट्र

चारित्र्यावर संशयातून विवाहितेला जाळून केले ठार; पती-सासऱ्याची जन्मठेप उच्च न्यायालयाकडून कायम

नागपूर: चारित्र्यावर संशय घेत विवाहितेला अमानुष मारहाण करून रॉकेल टाकून जाळून ठार केल्याप्रकरणी पती व सासऱ्याला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. घटनेची क्रूरता आणि उपलब्ध पुरावे लक्षात घेता न्यायालयाने दोघांचेही अपील फेटाळून लावले.

अमोल देशमुख (वय २८) आणि विजय देशमुख (वय ५३) अशी आरोपींची नावे असून ते यवतमाळ जिल्ह्यातील पोफळी, ता. उमरखेड येथील रहिवासी आहेत. मृत विवाहितेचे नाव छाया असे आहे. छायाचा २००९ मध्ये अमोल देशमुखसोबत विवाह झाला होता. सुरुवातीला दोन वर्षे छायाला चांगले वागवण्यात आले; मात्र त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेत आरोपींनी तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला.

१५ सप्टेंबर २०१२ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी छायाची हत्या करण्याच्या उद्देशाने आधी तिची बेदम मारहाण केली. त्यानंतर तिचा गळा दाबून रॉकेल टाकून आग लावली. छाया स्वतःला वाचविण्यासाठी प्रतिकार करत होती. या झटापटीत आरोपींचे कपडेही रॉकेलने ओले झाल्याचे तपासात समोर आले.

या प्रकरणात सत्र न्यायालयाने २ मार्च २०२१ रोजी दोन्ही आरोपींना हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरवत जन्मठेप व प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावला होता. दंड न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने प्रकरणातील पुरावे व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींचे अपील फेटाळून लावत सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

13 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

19 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

19 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

19 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

19 तास ago

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…

20 तास ago