बारामती: सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत ही घोषणा पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष Praful Patel यांनी केली. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष नव्या जोमाने भरारी घेईल, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.
या वेळी बोलताना पटेल यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या नेतृत्वगुणांचे तोंडभरून कौतुक केले. “नेतृत्व कसं असावं याचं उत्तम उदाहरण अजितदादांनी घालून दिलं. व्यक्ती पदानं नव्हे, तर कर्तृत्वानं महान ठरते. दादा सर्वार्थानं दादा होते. ते कधीही खचले नाहीत. पक्ष आणि कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या मनात प्रचंड तळमळ होती. त्यांच्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादीला वैभवाचे दिवस पाहायला मिळाले,” अशा शब्दांत पटेल यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
राष्ट्रीय अधिवेशनात भाषण करताना पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे आमदार Rohit Pawar यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. “सध्या काही जण आम्हाला पक्ष कसा चालवायचा याचे सल्ले देत आहेत. ज्यांचं आमच्या पक्षाशी काही देणंघेणं नाही, ते उपदेश करत आहेत. महिन्याभरात काही जण इकडे-तिकडे फिरताना दिसत आहेत. त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक अशी अवस्था आहे,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली.
दरम्यान, २८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईहून बारामतीकडे जात असताना अजित पवार यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचे निधन झाले होते. या धक्कादायक घटनेनंतर तीन दिवसांतच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण आले होते. आजच्या निर्णयामुळे त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
सुनेत्रा पवार यांनी २०२४ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादी (शप) च्या उमेदवार Supriya Sule यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर याच वर्षी त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आणि आता पक्षाध्यक्षपदाची धुरा देखील स्वीकारली आहे.
लवकरच त्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…