महाराष्ट्र

महिला नेतृत्वाचा नवा अध्याय! राष्ट्रवादी एकत्रिकरणाच्या चर्चांना उधाण; त्या बड्या नेत्याच मोठ विधान

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आज आमदारांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या विधिमंडळ गटनेत्या म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी लोकभवन येथे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.

या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांनी मोठं विधान केलं आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होत असल्याचा आनंद व्यक्त करत ते म्हणाले, “सुनेत्रा पवार सक्षम आहेत. त्या प्रशासन उत्तम प्रकारे सांभाळतील. त्यांचं उपमुख्यमंत्री होणं ही पक्षासाठी अभिमानाची बाब आहे.”

यावेळी अतुल बेनके यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबतही भूमिका स्पष्ट केली. “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात ही अजित पवार यांची इच्छा होती. यासंदर्भात अजित पवार, खासदार अमोल कोल्हे आणि माझ्यासोबत चर्चाही झाली होती. सध्या राजकीय परिस्थिती काहीही असली तरी भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्कीच एकत्र येतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महत्त्वाचे म्हणजे, अतुल बेनके यांनी यापूर्वीही विधानसभा निवडणुकीच्या काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी भूमिका उघडपणे मांडली होती. त्यांच्या बॅनरवर अनेकदा शरद पवार यांचे फोटो झळकले होते. यामुळे राजकीय वादही निर्माण झाले होते. मात्र टीका-टीप्पणींकडे दुर्लक्ष करत अतुल बेनके आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते.

अतुल बेनके यांचे वडील वल्लभ बेनके हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यामुळे बेनके कुटुंबीयांचे पवार कुटुंबाशी घनिष्ठ संबंध राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर अतुल बेनके यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य एकत्रिकरणाच्या चर्चांना वेग आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

14 तास ago

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

19 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

19 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

19 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

19 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

21 तास ago