महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 87 शाळा बोगस….

औरंगाबाद: नुकतेच राज्यातील 800 शाळा बोगस असल्याचं शिक्षण विभागाच्या पडताळणीत समोर आली, आणि आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील तब्बल 87 खासगी इंग्रजी शाळा बोगस असल्याचे समोर आले असून शहरातील बीड बायपास, सातारा परिसर, हर्सूल,सावंगी, पडेगाव या परिसरात या बोगस शाळा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

काही महिन्यांपूर्वी शिक्षण विभागाने अवैध शाळांवर कारवाई करण्यासंदर्भात शाळांच्या संस्थाचालकांना पत्र पाठवल्यानंतर जिल्ह्यात सीबीएसई, आयसीएसईची मंडळाची मान्यता प्रस्तावित असल्याच्या एकूण 87 शाळा शहरात असल्याचे शिक्षण विभागाला आढळून आले होते. पुढे शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीत यापैकी 18 शाळांकडे एनओसी, तर 17 शाळांकडे मान्यताच नाही, तसेच उर्वरित 52 शाळांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत. मात्र असे असताना देखील नवीन शैक्षणिक वर्षासाठी या शाळांमध्ये भरमसाट शुल्क घेऊन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

पालकांनो बोगस शाळा अशी ओळखा..!

पालकांनी मुलांचे ॲडमिशन करताना शाळेकडे संबंधित बोर्ड आणि शासन मान्यतेची चौकशी करावी.

तसेच संबंधित शाळेकडे शासनाने दिलेला मान्यता आदेश क्रमांक तपासून घ्यावा.

शाळांनी सर्व माहिती शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शनी भागात लावली आहे का? हे पालकांनी तपासून घ्यावे.

मुलांचे ॲडमिशन करताना संबंधित शाळेच्या मान्यतेबाबत शंका असल्यास शिक्षण विभागाच्या कार्यालयात शाळेची चौकशी करून घ्यावी.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

56 मिनिटे ago

पत्नी खून प्रकरणात दत्तात्रय गायकवाड निर्दोष; परिस्थितीजन्य पुरावे ठरले अपुरे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…

59 मिनिटे ago

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

24 तास ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

1 दिवस ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

2 दिवस ago