क्राईम

पाबळमध्ये दिवसाढवळ्या तीन लाखांचे दागिने चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील कमळळोबाचा माळ परिसरात राहणारे व्यक्ती दुपारच्या सुमारास शेतात गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील तीन लाखांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पाबळ (ता. शिरुर) येथील कमळळोबाचा माळ परिसरात राहणाऱ्या विमल चौधरी यांच्या शेतातील विहिरीचे काम सुरु असल्याने दुपारच्या सुमारास घरातील सर्व लोक घराला कुलूप लावून शेतात गेलेले होते. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास विमल चौधरी घरी आल्या असताना त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी घरात पाहिले असता कपाट उघडे तसेच सर्व साहित्य अस्थाव्यस्थ पडल्याचे दिसून आले. दरम्यान त्यांनी घरातील कपाटाची पाहणी केली असता कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल 3 लाख 10 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

याबाबत विमल भानुदास चौधरी (वय ५३) रा. कमळळोबाचा माळ पाबळ (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी व पोलीस नाईक प्रताप कांबळे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

3 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

4 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

4 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

4 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

4 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

4 तास ago