महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे ‘टीसीएस’कडून जतन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक–खासगी भागीदारीला बळ

मुंबई: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे अधिक प्रभावीपणे घडत असून, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि टीसीएस फाउंडेशन यांचे या कार्यात मोलाचे योगदान लाभत आहे. वारसा जतनामध्ये खासगी क्षेत्राचा सक्रिय सहभाग वाढावा, या धोरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने चालना दिली आहे.

या धोरणांतर्गत राज्यातील ऐतिहासिक वास्तू आणि नैसर्गिक परिसंस्थांच्या संरक्षणासाठी सार्वजनिक–खासगी भागीदारीचा आदर्श निर्माण झाला असून, मुंबईतील अनेक महत्त्वाच्या वारसा वास्तूंना नवसंजीवनी मिळाली आहे.

राजाबाई टॉवर आणि ग्रंथालय इमारतीचे संवर्धन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून गेल्या दशकात मुंबई विद्यापीठातील ऐतिहासिक राजाबाई क्लॉक टॉवर आणि ग्रंथालय इमारतीच्या संवर्धन व पुनर्संचयितीकरणाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात आला.

१५६ वर्षे जुन्या राजाबाई टॉवरच्या बाह्य प्रकाशव्यवस्थेचे आधुनिकीकरण तसेच ग्रंथालयातील फर्निचरची दुरुस्ती व पुनर्स्थापना या कामांना शासनाच्या पाठबळामुळे गती मिळाली.या प्रकल्पासाठी ‘टीसीएस’ने ८.९० कोटी रुपये योगदान दिले असून, या उपक्रमाची दखल घेत युनेस्कोने २०१८ च्या आशिया–पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कारांमध्ये गौरव केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला आंतरराष्ट्रीय मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक–खासगी भागीदारीतून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (CSMVS) यांच्या संवर्धन व पुनर्संचयितीकरण प्रकल्पालाही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली.या प्रकल्पासाठी ‘टीसीएस’ने टप्प्याटप्प्याने एकूण २४.७९ कोटी रुपये योगदान दिले आहे.

सन २०२२ मध्ये युनेस्कोच्या आशिया–पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कारांत ‘अवॉर्ड ऑफ एक्सलन्स’ मिळवणारा हा प्रकल्प वास्तुशास्त्रीय व अभियांत्रिकी दृष्टिकोनातून आदर्श ठरला. गेल्या १०० वर्षांतील वस्तुसंग्रहालयाचे हे पहिले मोठे पुनर्संचयितीकरण कार्य मानले जाते.

वारसा जतनात महाराष्ट्राचा आदर्श

सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी शासन आणि खासगी क्षेत्रातील समन्वयातून उभा राहिलेला हा उपक्रम महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरत असून, भविष्यातील वारसा संवर्धन प्रकल्पांसाठी तो एक आदर्श मॉडेल ठरत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

3 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

3 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

3 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

3 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

5 तास ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

5 तास ago