महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे ‘टीसीएस’कडून जतन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक–खासगी भागीदारीला बळ

मुंबई: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे अधिक प्रभावीपणे घडत असून, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि टीसीएस फाउंडेशन यांचे या कार्यात मोलाचे योगदान लाभत आहे. वारसा जतनामध्ये खासगी क्षेत्राचा सक्रिय सहभाग वाढावा, या धोरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने चालना दिली आहे.

या धोरणांतर्गत राज्यातील ऐतिहासिक वास्तू आणि नैसर्गिक परिसंस्थांच्या संरक्षणासाठी सार्वजनिक–खासगी भागीदारीचा आदर्श निर्माण झाला असून, मुंबईतील अनेक महत्त्वाच्या वारसा वास्तूंना नवसंजीवनी मिळाली आहे.

राजाबाई टॉवर आणि ग्रंथालय इमारतीचे संवर्धन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून गेल्या दशकात मुंबई विद्यापीठातील ऐतिहासिक राजाबाई क्लॉक टॉवर आणि ग्रंथालय इमारतीच्या संवर्धन व पुनर्संचयितीकरणाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात आला.

१५६ वर्षे जुन्या राजाबाई टॉवरच्या बाह्य प्रकाशव्यवस्थेचे आधुनिकीकरण तसेच ग्रंथालयातील फर्निचरची दुरुस्ती व पुनर्स्थापना या कामांना शासनाच्या पाठबळामुळे गती मिळाली.या प्रकल्पासाठी ‘टीसीएस’ने ८.९० कोटी रुपये योगदान दिले असून, या उपक्रमाची दखल घेत युनेस्कोने २०१८ च्या आशिया–पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कारांमध्ये गौरव केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला आंतरराष्ट्रीय मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक–खासगी भागीदारीतून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (CSMVS) यांच्या संवर्धन व पुनर्संचयितीकरण प्रकल्पालाही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली.या प्रकल्पासाठी ‘टीसीएस’ने टप्प्याटप्प्याने एकूण २४.७९ कोटी रुपये योगदान दिले आहे.

सन २०२२ मध्ये युनेस्कोच्या आशिया–पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कारांत ‘अवॉर्ड ऑफ एक्सलन्स’ मिळवणारा हा प्रकल्प वास्तुशास्त्रीय व अभियांत्रिकी दृष्टिकोनातून आदर्श ठरला. गेल्या १०० वर्षांतील वस्तुसंग्रहालयाचे हे पहिले मोठे पुनर्संचयितीकरण कार्य मानले जाते.

वारसा जतनात महाराष्ट्राचा आदर्श

सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी शासन आणि खासगी क्षेत्रातील समन्वयातून उभा राहिलेला हा उपक्रम महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरत असून, भविष्यातील वारसा संवर्धन प्रकल्पांसाठी तो एक आदर्श मॉडेल ठरत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

किरकोळ वादातून शेतकरी महिलेवर लोखंडी वस्तूने हल्ला; खांदा फ्रॅक्चर

शिरूर (ओमकार भोरडे): शेतात ट्रॅक्टर का घातला आणि मुलाला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी…

9 तास ago

शिरूर तालुक्यात सामाईक मोटारीच्या वादातून भावाचा भावावर हल्ला; दगडाने डोक्यात मारहाण

शिरूर  (ओमकार भोरडे): सामाईक इलेक्ट्रिक मोटार वापरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने व भावजयाने लहान…

9 तास ago

प्रेमसंबंधातून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबावाचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा

इन्स्टाग्रामवरून ओळख, लग्नाचे आमिष, धमक्या आणि पोक्सोसह गंभीर कलमांखाली शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार…

9 तास ago

शिरूर तालुक्यात शेतकऱ्याची हत्या; परिसरात खळबळ…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रहिवासी व व्यवसायाने शेतकरी असलेले बाळासाहेब बबन तांबे यांचा…

11 तास ago

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

1 दिवस ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

2 दिवस ago