महाराष्ट्र

TET पेपरफुटीने परीक्षा व्यवस्थेचा बोजवारा; ४.२८ लाख उमेदवारांवर अन्याय – आमदार सत्यजीत तांबे

मुंबई: NEET नंतर आता शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीची घटना समोर आल्याने महाराष्ट्रातील परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत झाला आहे. ठाण्यात TET परीक्षेचा पेपर फुटल्याने नियोजित परीक्षा रद्द करण्याची वेळ आली असून, यामुळे तब्बल ४ लाख २८ हजारांहून अधिक उमेदवारांवर अन्याय झाल्याची टीका विधान परिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.

तांबे यांनी या घटनेला केवळ पेपरफुटी नव्हे, तर राज्यातील भ्रष्ट आणि ढासळलेल्या परीक्षा व्यवस्थेचे अपयश असल्याचे म्हटले आहे. “महाराष्ट्रात आता ‘पेपरफुटी’ हीच नवी परीक्षा पद्धत झाली आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे,” असे ते म्हणाले.

त्यांनी सांगितले की, NEET, CBSE मूल्यांकनातील गोंधळ, UGC-NET तसेच विविध प्रवेश आणि भरती परीक्षांमधील अनियमिततेमुळे लाखो विद्यार्थ्यांची मेहनत, वेळ आणि पैसा वाया गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक नैराश्य आणि असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

TET प्रकरण अधिक गंभीर असल्याचे सांगताना तांबे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनेक शिक्षकांना सेवेत कायम राहण्यासाठी TET परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्यामुळे २० ते ३० वर्षे सेवा केलेले आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले शिक्षकही नोकरी टिकवण्यासाठी ही परीक्षा देत आहेत. अशा परिस्थितीत पेपरफुटी होणे म्हणजे त्यांच्या नोकरीवर आणि कुटुंबाच्या भवितव्यावर घाला घालण्यासारखे असल्याचे त्यांनी म्हटले.

“देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ८० वर्षे झाली. जग कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सायबर सुरक्षेच्या युगात पोहोचले आहे. मात्र आपण अजूनही परीक्षा सुरक्षित घेऊ शकत नाही, MPSC चे निकाल वेळेत लावू शकत नाही आणि परीक्षा कधी ऑनलाइन तर कधी ऑफलाइन अशा गोंधळात अडकलेल्या आहेत. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

तांबे यांनी सांगितले की, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींविषयी त्यांनी नुकतेच विधान परिषदेत सरकारचे लक्ष वेधले होते. “या संपूर्ण व्यवस्थेच्या मुळाशी भ्रष्टाचार असून व्यवस्था पारदर्शक झाली तर अनेकांचे हितसंबंध धोक्यात येतील. त्यामुळे काहींना ही व्यवस्था सुधारलेलीच नको आहे,” असा आरोपही त्यांनी केला.

केवळ आरोपींना अटक करून हा प्रश्न सुटणार नसून परीक्षा प्रणालीची संपूर्ण पुनर्रचना करण्याची गरज असल्याचे तांबे यांनी नमूद केले. सरकारने परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा, अशी मागणी त्यांनी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तिरंग्याच्या प्रेमामागे भाजपा-आरएसएसचा कावा नसावा’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेक वर्षे तिरंगा ध्वजाला विरोध केला, स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग नव्हता…

9 तास ago

आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयाला सचिन अहिरांची सदिच्छा भेट; आरोग्य सुविधांचा घेतला आढावा

मुंबई : आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या वरळी येथील आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयाला…

14 तास ago

लाल किल्ल्यावरून मोदींचा ‘वंदे मातरम्’चा जयघोष; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना थेट सल्ला

मुंबई : स्वातंत्र्यलढ्यात असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. याच…

14 तास ago

संसद परिसरात प्रियंका गांधी आणि भाजप खासदार आमनेसामने;

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यातही सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष कायम आहे. मंगळवारी…

16 तास ago

‘अंधारे आल्या अन् शिवसेनेचं अस्तित्वच संपलं’; भाजप आमदारांचा हल्लाबोल, ‘नैराश्यातून बडबड सुरू’

सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार…

16 तास ago

अण्णासाहेब पाटील महामंडळात मोठा फेरबदल; नरेंद्र पाटलांच्या मागणीला यश, एमडी विजयसिंह देशमुखांची बदली

मुख्यमंत्री फडणवीसांकडून मागणीची दखल; अविनाश रणखांब यांची नव्या एमडीपदी नियुक्ती मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक…

17 तास ago