महाराष्ट्र

TET परीक्षा रद्द प्रकरणी सरकारवर अमोल मातेले यांचा हल्लाबोल

मुंबई: शिक्षक पात्रता परीक्षा (TET) रद्द होण्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील परीक्षा व्यवस्थेतील सातत्याने होणाऱ्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाल्याचा आरोप त्यांनी केला.

“आज राज्यातील युवकांच्या मनात एकच प्रश्न आहे. या सरकारला नेमके ‘फोडाफोडी’चेच वेड लागले आहे का?” असा सवाल करत मातेले यांनी राजकारणातील पक्षफोडीच्या आरोपांसह परीक्षा व्यवस्थेतील वारंवार होणाऱ्या त्रुटींवर सरकारला धारेवर धरले.

नीट, विविध स्पर्धा परीक्षा, TET आणि इतर परीक्षांभोवती निर्माण झालेल्या वादांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेतात, पालक कर्ज काढून शिक्षण देतात; मात्र परीक्षा प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

सरकारला प्रश्न विचारताना त्यांनी परीक्षा प्रक्रियेत वारंवार गोंधळ का होतो, विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे नुकसान भरून काढणार कोण, दोषींवर कठोर कारवाई कधी होणार आणि सुरक्षित व पारदर्शक परीक्षा प्रणाली कधी उभी राहणार, असे प्रश्न उपस्थित केले.”फक्त जाहिराती आणि घोषणांनी युवकांचा विश्वास मिळत नाही. पारदर्शक कारभार आणि जबाबदारी स्वीकारण्याची तयारी आवश्यक आहे,” असेही ते म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रत्येक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत, राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढा देईल, असा इशाराही ॲड. अमोल मातेले यांनी दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

TET पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करा; दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा…

मुंबई: महाराष्ट्रात रविवारी (२८ जून) होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या वृत्तांवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस…

2 तास ago

TET पेपरफुटीने परीक्षा व्यवस्थेचा बोजवारा; ४.२८ लाख उमेदवारांवर अन्याय – आमदार सत्यजीत तांबे

मुंबई: NEET नंतर आता शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीची घटना समोर आल्याने महाराष्ट्रातील परीक्षा व्यवस्थेवरील…

2 तास ago

शिरूर तालुक्यात बिबट्याने घातली महिलेवर झडप अन् ती झडप…

शिरूर : शिरूर तालुक्यातील मांडवण फराटा येथील गोकुळनगर परिसरात एका महिलेवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला.…

2 तास ago

जागतिक MSME दिनानिमित्त वाशीत ‘महाराष्ट्र MSME परिषद व पुरस्कार 2026’

मुंबई: जागतिक एमएसएमई (MSME) दिनानिमित्त महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) तर्फे शनिवारी (27 जून) वाशी…

6 तास ago

श्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी शासन सकारात्मक; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे: उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी शुक्रवारी श्रीक्षेत्र आळंदी येथे भेट…

7 तास ago

बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आणि जनतेशी नाळ; एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा आढावा

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघर्षातून नेतृत्व घडवत स्वतंत्र राजकीय स्थान निर्माण केल्याची…

7 तास ago