महाराष्ट्र

वातावरण तापले! मंगळवेढ्यातील प्रस्थापित नेत्यांना जरांगे-पाटलांचा विसर

मंगळवेढा: मराठा समाजाच्या ज्वलंत प्रश्नावरून मंगळवेढ्यातील प्रस्थापित नेत्यांचे मौन समाज बांधवांना चांगलेच जाणवू लागले आहे. निवडणुका आल्या की ‘एक गठ्ठा मतांसाठी’ मराठा समाजाची आठवण काढणारे हेच नेते, आरक्षणासारख्या अस्मितेच्या प्रश्नावर मात्र अचानक ‘बहिरे’ का झाले आहेत. हा प्रश्न आता समाजामध्ये थेट विचारला जातो आहे.

मनोज जरांगे-पाटील यांनी उभारलेला आरक्षणाचा लढा हा आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात पोहोचला आहे. समाजातील कार्यकर्ते खेड्यापाड्यात घोंगडी बैठका घेऊन लोकजागृती करत आहेत. मात्र, मंगळवेढ्यातील राजकीय नेते मात्र जणू “या आगीतून हात भाजून घेऊ नये” अशा भूमिकेत असल्याचे चित्र दिसते. याआधी निवडणुकीच्या तोंडावर जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी या नेत्यांत स्पर्धा लागली होती. पण निवडणुका संपताच समाजाच्या अस्मितेचा प्रश्न असलेल्या आंदोलनात ते गायबच ! अशा दुहेरी चेहऱ्याच्या राजकारणाला समाज आता वैतागला आहे,

‘केवळ मतपेटीसाठी मराठा, अन्यथा ओझं’ अशी नेत्यांची वागणूक उघडी पडल्याने मंगळवेढ्यातील मराठा बांधवांमध्ये तीव्र असंतोष आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी क्षेत्रातील निवडणुका तोंडावर आहेत. समाजाच्या मनातील ही खदखद जर मतपेटीत उफाळून आली, तर प्रस्थापित नेत्यांचे गणित पूर्णपणे बदलू शकते. फक्त भाषणांतून मोठे बोलणारे, पण अस्मितेच्या लढ्यात एक पाऊलही न टाकणारे नेते पुढेही टिकतील का? की समाजातून नवे नेतृत्व उभे राहील हे आता थेट मतदारांनीच ठरवायचे आहे.

गेल्या एक महिन्यापासून तालुक्यातील गावांमध्ये चावडी बैठका घेऊन मराठा समाजाला मोठ्या संख्येने मुंबईकडे जाण्यासंबंधीचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. त्यामुळे हजारो गाड्या तालुक्यातून आज निघतील असे चित्र निर्माण झाले आहे. जेव्हा जेव्हा जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटीत उपोषण केले तेव्हा तेव्हा मंगळवेढ्यात देखील आमरण उपोषण उभे राहिले. त्यामुळे तालुक्याचे आरक्षण लढ्यात महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. तेही सर्वसामान्य मराठा बांधवांचे… त्यामुळे या पुढचा लढा देखील सर्वसामान्य मराठाच लढणार आहेत आणि जशी वेळ येईल तसा हिशोबही चुकता करतील, यात शंका नाही.

जातीच्या जीवावर यश मिळवले

मराठा समाजाच्या अनेक पुढाऱ्यांनी आजपर्यंत आपल्या जातीच्या जीवावर राजकारणात मोठे यश मिळवले, सर्वच राजकीय पक्षात मराठा समाजाच्या नेत्यांना मानाचे स्थान आहे. त्यामुळे या आंदोलनाला पुढाऱ्यांनी काही ठिकाणी हात झटकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आशा नेत्यांना समाज जागा दाखवतीलच यात शंका नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…

8 तास ago

जवस तेलाचे उपयोग

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…

12 तास ago

गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय

छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…

12 तास ago

पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…

12 तास ago

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…

12 तास ago

पुण्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटना; चिमुकलीचा मृत्यू, तर मद्यधुंद कारचालकाच्या अपघातात दोघांचा बळी

पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…

13 तास ago