महाराष्ट्र

वातावरण तापले! मंगळवेढ्यातील प्रस्थापित नेत्यांना जरांगे-पाटलांचा विसर

मंगळवेढा: मराठा समाजाच्या ज्वलंत प्रश्नावरून मंगळवेढ्यातील प्रस्थापित नेत्यांचे मौन समाज बांधवांना चांगलेच जाणवू लागले आहे. निवडणुका आल्या की ‘एक गठ्ठा मतांसाठी’ मराठा समाजाची आठवण काढणारे हेच नेते, आरक्षणासारख्या अस्मितेच्या प्रश्नावर मात्र अचानक ‘बहिरे’ का झाले आहेत. हा प्रश्न आता समाजामध्ये थेट विचारला जातो आहे.

मनोज जरांगे-पाटील यांनी उभारलेला आरक्षणाचा लढा हा आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात पोहोचला आहे. समाजातील कार्यकर्ते खेड्यापाड्यात घोंगडी बैठका घेऊन लोकजागृती करत आहेत. मात्र, मंगळवेढ्यातील राजकीय नेते मात्र जणू “या आगीतून हात भाजून घेऊ नये” अशा भूमिकेत असल्याचे चित्र दिसते. याआधी निवडणुकीच्या तोंडावर जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी या नेत्यांत स्पर्धा लागली होती. पण निवडणुका संपताच समाजाच्या अस्मितेचा प्रश्न असलेल्या आंदोलनात ते गायबच ! अशा दुहेरी चेहऱ्याच्या राजकारणाला समाज आता वैतागला आहे,

‘केवळ मतपेटीसाठी मराठा, अन्यथा ओझं’ अशी नेत्यांची वागणूक उघडी पडल्याने मंगळवेढ्यातील मराठा बांधवांमध्ये तीव्र असंतोष आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी क्षेत्रातील निवडणुका तोंडावर आहेत. समाजाच्या मनातील ही खदखद जर मतपेटीत उफाळून आली, तर प्रस्थापित नेत्यांचे गणित पूर्णपणे बदलू शकते. फक्त भाषणांतून मोठे बोलणारे, पण अस्मितेच्या लढ्यात एक पाऊलही न टाकणारे नेते पुढेही टिकतील का? की समाजातून नवे नेतृत्व उभे राहील हे आता थेट मतदारांनीच ठरवायचे आहे.

गेल्या एक महिन्यापासून तालुक्यातील गावांमध्ये चावडी बैठका घेऊन मराठा समाजाला मोठ्या संख्येने मुंबईकडे जाण्यासंबंधीचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. त्यामुळे हजारो गाड्या तालुक्यातून आज निघतील असे चित्र निर्माण झाले आहे. जेव्हा जेव्हा जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटीत उपोषण केले तेव्हा तेव्हा मंगळवेढ्यात देखील आमरण उपोषण उभे राहिले. त्यामुळे तालुक्याचे आरक्षण लढ्यात महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. तेही सर्वसामान्य मराठा बांधवांचे… त्यामुळे या पुढचा लढा देखील सर्वसामान्य मराठाच लढणार आहेत आणि जशी वेळ येईल तसा हिशोबही चुकता करतील, यात शंका नाही.

जातीच्या जीवावर यश मिळवले

मराठा समाजाच्या अनेक पुढाऱ्यांनी आजपर्यंत आपल्या जातीच्या जीवावर राजकारणात मोठे यश मिळवले, सर्वच राजकीय पक्षात मराठा समाजाच्या नेत्यांना मानाचे स्थान आहे. त्यामुळे या आंदोलनाला पुढाऱ्यांनी काही ठिकाणी हात झटकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आशा नेत्यांना समाज जागा दाखवतीलच यात शंका नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात महसूलचे अधिकारी कर्मचारी आरक्षण सोडतीत व्यस्त; अन मुरुम माफिया नैसर्गिक संपत्तीच्या लुटीत मस्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात आज (शुक्रवार) ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वार्डनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया…

1 तास ago

रांजणगाव MIDC मधील औषध कंपनीला २५ लाखांच्या खंडणीची मागणी; वकिलाविरोधात गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी…

2 तास ago

कुर्ला विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…

7 तास ago

राष्ट्रवादीतील संघर्षाचा फुगा आणि घराणेशाहीची वास्तवकथा

मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…

7 तास ago

विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची ‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’ सुरू

मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…

7 तास ago

पुणे विषारी दारू प्रकरणाच्या तपासाला वेग; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनांनुसार सीआयडीची व्यापक कारवाई

पुणे: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती…

7 तास ago