महाराष्ट्र

कोणत्याही परिस्थितीत संविधान आणि कायद्याचे पालन करायला हवे

मुंबई: कोणत्याही परिस्थितीत संविधान आणि कायद्याचे पालन करायला हवे. आपल्या श्रद्धेला कुणी डिवचलं तरी देखील कायदा हातात घेऊ नका, असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमातून केलं आहे.

कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी देशासह जगभरात सुरू असलेल्या विविध घडामोडींवर भाष्य केलं. सध्या जगभरात कट्टरता असहिष्णुता आणि अस्थिरता वाढत आहे. धर्म सर्वत्र पोहोचला पाहिजे. मात्र त्याचा अर्थ धर्मांतर करणे नव्हे, धर्म म्हणजे एक जीवनस्वभाव आहे.

संघा इतका इतर कोणत्याही संघटनेला तीव्र विरोध सहन करावा लागला नसेल. मात्र शुद्ध प्रेम हाच संघाचा आधार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर सामाजिक समरसतेवर बोलताना ते म्हणाले, “मंदिर, पाणी आणि स्मशान हे सर्वासाठी खुलं असावं, त्यामध्ये कोणताही भेदभाव असायला नको.”

दरम्यान, याच कार्यक्रमातून त्यांनी कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नका असंही आवाहन केलं. ते म्हणाले, “काहीही झालं तरी संविधान आणि कायद्याचे पालन केलं पाहिजे. आपल्या श्रद्धेला कुणी डिवचलं तरी देखील कायदा हातात घेऊ नका, पोलिसांकडे जा गरज असल्यास शांततेत आंदोलन करा, मात्र, टायर जाळणे किंवा दगडफेक अशा गोष्टी करू नका.

देशातील जनतेने आत्मनिर्भरतेवर भर देण्याचं आवाहन करताना त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारावर भाष्य करताना ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय व्यापार स्वेच्छेने व्हायला हवा, दबावाखाली नव्हे. शिवाय जे आपल्या देशात तयार होते ते बाहेरून आणण्याची गरज नाही. जे इथे तयार होत नाही तेच परदेशातून घ्यायला हवं, असं आवाहन देखील भागवत यांनी केलं.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

23 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

23 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

23 तास ago