महाराष्ट्र

१ एप्रिल पासून देशात पहिली डिजिटल जनगणना; ३३ प्रश्नांची माहिती देणे नागरिकांना बंधनकारक

नवी दिल्ली: केंद्र सरकारने आगामी जनगणनेसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली असून, १ एप्रिल पासून भारतात पहिल्यांदाच पूर्णतः डिजिटल जनगणना राबवली जाणार आहे. तब्बल १६ वर्षांनंतर होणारी ही जनगणना प्रशासनिक व्यवस्थेत मोठा बदल घडवणारी ठरणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी जातीवर आधारित आकडेवारीही डिजिटल पद्धतीने गोळा केली जाणार आहे.

गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जनगणनेचा पहिला टप्पा १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत पार पडणार असून, प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशाला त्यांच्या सोयीप्रमाणे ३० दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. या महामोहिमेसाठी देशभरात ३० लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

३३ प्रश्नांची प्रश्नावली; माहिती देणे बंधनकारक

या जनगणनेत घरांची यादी तयार करण्यासाठी प्रशासनाने ३३ प्रश्नांची प्रश्नावली निश्चित केली आहे. सरकारी अधिकारी नागरिकांच्या घरी भेट देऊन ही माहिती गोळा करतील. नागरिकांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची अचूक माहिती देणे बंधनकारक असेल.

या प्रश्नांमध्ये घराचा प्रकार, बांधकामाचे साहित्य, पिण्याच्या पाण्याचा स्रोत, शौचालय व वीज सुविधा, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन, इंटरनेट व मोबाईलची उपलब्धता, वाहनांची माहिती यासह घरप्रमुखाची सामाजिक श्रेणी (अनुसूचित जाती/जमाती/इतर) यासारख्या तपशीलांचा समावेश आहे.

जनगणनेतील ‘खास’ बाबी

यंदाच्या जनगणनेत अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

जिओ-टॅगिंग: प्रत्येक इमारतीचे अचूक स्थान नकाशावर नोंदवले जाणार

जातीनिहाय डिजिटल डेटा: सामाजिक व आर्थिक योजनांचे नियोजन अधिक अचूक होणार

मोबाईल ॲपचा वापर: कागदाऐवजी अँड्रॉइड व आयओएस ॲपद्वारे माहिती संकलन

सेल्फ एन्युमरेशन: इंटरनेट सुविधा असलेले नागरिक स्वतः माहिती भरू शकणार

रोजगार निर्मितीला चालना

२०११ नंतर प्रथमच होत असलेल्या या जनगणनेमुळे देशभरात सुमारे १.०२ कोटी मानव-दिनांचा रोजगार निर्माण होणार आहे. २०२१ ची जनगणना कोरोना महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली होती.

सरकारी योजनांचा पाया

जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्यापुरती मर्यादित नसून, सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा सर्वात महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने ३३ प्रश्नांची अचूक व संपूर्ण माहिती देणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

10 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

11 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

12 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

16 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

16 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

16 तास ago