मुंबई: आज, २३ जानेवारी रोजी भारताच्या इतिहासातील दोन तेजस्वी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वांची जयंती साजरी होत आहे. स्वातंत्र्यलढ्याचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जन्मतारीख आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओडिशातील कटक येथे झाला. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढ्याचा मार्ग स्वीकारत आझाद हिंद सेनेची स्थापना केली. “तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आज़ादी दूँगा” या घोषणेनं हजारो तरुणांना देशासाठी बलिदान देण्यास प्रेरित केले.
तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी मुंबईत झाला. निर्भीड विचार, धारदार भाषणशैली आणि मराठी अस्मितेचा बुलंद आवाज म्हणून ते ओळखले जातात. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी मराठी माणसाच्या हक्कांसाठी संघर्ष केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावली.
दोन्ही नेत्यांमध्ये स्वाभिमान, राष्ट्रभक्ती, निर्भीड नेतृत्व आणि सामान्य जनतेसाठी लढण्याची जिद्द हे समान गुण होते. त्यांच्या विचारांनी लाखो लोकांना प्रेरित केले असून आजही त्यांचे कार्य आणि विचार तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.
देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक इतिहासात अमिट ठसा उमटवणाऱ्या या दोन्ही महान नेत्यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे.
सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…
हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…
कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…
1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…
मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…
मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…