मुंबई: आज, २३ जानेवारी रोजी भारताच्या इतिहासातील दोन तेजस्वी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वांची जयंती साजरी होत आहे. स्वातंत्र्यलढ्याचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जन्मतारीख आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओडिशातील कटक येथे झाला. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढ्याचा मार्ग स्वीकारत आझाद हिंद सेनेची स्थापना केली. “तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आज़ादी दूँगा” या घोषणेनं हजारो तरुणांना देशासाठी बलिदान देण्यास प्रेरित केले.
तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी मुंबईत झाला. निर्भीड विचार, धारदार भाषणशैली आणि मराठी अस्मितेचा बुलंद आवाज म्हणून ते ओळखले जातात. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी मराठी माणसाच्या हक्कांसाठी संघर्ष केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावली.
दोन्ही नेत्यांमध्ये स्वाभिमान, राष्ट्रभक्ती, निर्भीड नेतृत्व आणि सामान्य जनतेसाठी लढण्याची जिद्द हे समान गुण होते. त्यांच्या विचारांनी लाखो लोकांना प्रेरित केले असून आजही त्यांचे कार्य आणि विचार तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.
देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक इतिहासात अमिट ठसा उमटवणाऱ्या या दोन्ही महान नेत्यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे.
रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…
पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…
घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…
व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…
लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…