महाराष्ट्र

उल्हासनगरमधील धोकादायक इमारतींचा क्लस्टर डेव्हलपमेंटद्वारे पुनर्विकास

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची जाहीर सभा

उल्हासनगर: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाच्यावतीने उल्हासनगर येथे भव्य जाहीर सभा पार पडली. या सभेत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी व सिंधी समाजाच्या एकतेवर भर देत उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासाचा ठाम निर्धार व्यक्त केला.

एकनाथ शिंदे म्हणाले की, “उल्हासनगरमध्ये मराठी आणि सिंधी बांधव एकदिलाने काम करत आहेत. दुधात साखर विरघळावी तसे हे नाते आहे. या विश्वास आणि विकासाच्या युतीमुळेच शिवसेना, ओमी कलानी टीम, साई पार्टी आणि इतर घटक एकत्र आले आहेत.” त्यामुळे महापालिकाही आपल्या सोबत असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सभेत बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री असताना उल्हासनगरच्या विकासासाठी सुमारे १४०० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प मार्गी लागले. सुपर स्पेशालिटी कॅशलेस रुग्णालय, परिवहन सेवा, अमृत योजनेतून ड्रेनेज लाईन, पाणीपुरवठा योजना, रस्ते, गार्डन, खेळाची मैदाने यांसारखी कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, उल्हासनगरमधील सर्व धोकादायक इमारतींचा क्लस्टर डेव्हलपमेंटद्वारे पुनर्विकास केला जाईल आणि नागरिकांना सुरक्षित, सुविधा-संपन्न घरे दिली जातील. “सत्ता किंवा खुर्चीसाठी नाही, तर विकासासाठी शिवसेना काम करते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘लाडकी बहिण’ योजनेचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. महिलांना आत्मनिर्भर बनवणे हाच या योजनेचा उद्देश आहे. “मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे, गरिबी पाहिली आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या वेदना मला समजतात,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

महापालिका निवडणुकीत शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचा भगवा झेंडा उल्हासनगर महापालिकेवर नक्कीच फडकणार, असा विश्वास व्यक्त करत शिंदे यांनी मतदारांना १५ तारखेला धनुष्यबाण या चिन्हासमोर बटन दाबण्याचे आवाहन केले.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी आमदार पप्पू कलानी, साई पक्षप्रमुख जीवन ईदनानी, टीम ओमी कलानीचे प्रमुख ओमी कलानी तसेच पीपल्स रिपब्लिक पक्षाचे प्रमुख जयदीप कवाडे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, उमेदवार आणि नागरिक उपस्थित होते. उल्हासनगरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, ही माझी हमी आहे, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी भाषणाची सांगता केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

2 मिनिटे ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

2 तास ago

ऑपरेशन टायगर! उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का? सहा खासदारांच्या फुटीची चर्चा, ओमराजे निंबाळकर दिल्लीत

दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील…

2 तास ago

कौटुंबिक वादातून पोलिस शिपायाची आत्महत्या

चंदगड: नागरदळे (ता. चंदगड) येथे मीरा-भाईंदर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलिस शिपाई दयानंद कृष्णा पाटील (वय…

2 तास ago

एकल पाल्य विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA) यांच्या वतीने राज्यातील एकल पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना सहाय्य,…

3 तास ago

शाळा-महाविद्यालयांच्या दारातच नशेचा बाजार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…

21 तास ago