महाराष्ट्र

उल्हासनगरमधील धोकादायक इमारतींचा क्लस्टर डेव्हलपमेंटद्वारे पुनर्विकास

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची जाहीर सभा

उल्हासनगर: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाच्यावतीने उल्हासनगर येथे भव्य जाहीर सभा पार पडली. या सभेत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी व सिंधी समाजाच्या एकतेवर भर देत उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासाचा ठाम निर्धार व्यक्त केला.

एकनाथ शिंदे म्हणाले की, “उल्हासनगरमध्ये मराठी आणि सिंधी बांधव एकदिलाने काम करत आहेत. दुधात साखर विरघळावी तसे हे नाते आहे. या विश्वास आणि विकासाच्या युतीमुळेच शिवसेना, ओमी कलानी टीम, साई पार्टी आणि इतर घटक एकत्र आले आहेत.” त्यामुळे महापालिकाही आपल्या सोबत असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सभेत बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री असताना उल्हासनगरच्या विकासासाठी सुमारे १४०० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प मार्गी लागले. सुपर स्पेशालिटी कॅशलेस रुग्णालय, परिवहन सेवा, अमृत योजनेतून ड्रेनेज लाईन, पाणीपुरवठा योजना, रस्ते, गार्डन, खेळाची मैदाने यांसारखी कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, उल्हासनगरमधील सर्व धोकादायक इमारतींचा क्लस्टर डेव्हलपमेंटद्वारे पुनर्विकास केला जाईल आणि नागरिकांना सुरक्षित, सुविधा-संपन्न घरे दिली जातील. “सत्ता किंवा खुर्चीसाठी नाही, तर विकासासाठी शिवसेना काम करते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘लाडकी बहिण’ योजनेचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. महिलांना आत्मनिर्भर बनवणे हाच या योजनेचा उद्देश आहे. “मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे, गरिबी पाहिली आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या वेदना मला समजतात,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

महापालिका निवडणुकीत शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचा भगवा झेंडा उल्हासनगर महापालिकेवर नक्कीच फडकणार, असा विश्वास व्यक्त करत शिंदे यांनी मतदारांना १५ तारखेला धनुष्यबाण या चिन्हासमोर बटन दाबण्याचे आवाहन केले.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी आमदार पप्पू कलानी, साई पक्षप्रमुख जीवन ईदनानी, टीम ओमी कलानीचे प्रमुख ओमी कलानी तसेच पीपल्स रिपब्लिक पक्षाचे प्रमुख जयदीप कवाडे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, उमेदवार आणि नागरिक उपस्थित होते. उल्हासनगरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, ही माझी हमी आहे, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी भाषणाची सांगता केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जवस तेलाचे उपयोग

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…

3 तास ago

गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय

छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…

3 तास ago

पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…

3 तास ago

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…

3 तास ago

पुण्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटना; चिमुकलीचा मृत्यू, तर मद्यधुंद कारचालकाच्या अपघातात दोघांचा बळी

पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…

3 तास ago

‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ तत्त्वावर म्हाडाकडून २९५ सदनिकांची विक्री

पुणे: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) अंतर्गत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने सर्वसाधारण प्रवर्गातील…

3 तास ago