महाराष्ट्र

निवडणुकीचा अखेर मुहूर्त ठरला! नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद अन् महापालिका निवडणूक एकत्र

संभाजीनगर: गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका रखडल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या निवडणुका नेमक्या कधी होणार याची मोठी माहिती समोर आली आहे.

छत्रपती संभाजी नगर येथे राज्य निवडणूक आयोगाची स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या दृष्टिने आढाव बैठक पार पाडली. या बैठकीत निवडणुका कधी होणार याची संकेत देण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाकडील मनुष्यबळ आणि साधनसामुग्रीचा विचार करता एकाच टप्प्यात या निवडणूक घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने निवडणूक होणार आहे. त्यामध्ये सर्वप्रथम ऑक्टोबर महिन्यात पंचायत समिती आणि नगर परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बार उडणार आहे.

जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक देखील एकत्र घेणे शक्य नसल्याने डिसेंबर महिन्यास सर्व महापालिकांची निवडणूक होणार असल्याचा अंदाज आहे. साधारण दोन ते तीन टप्प्यांमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. ऑक्टोबरमध्ये पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीचा बार दिवाळीनंतरच

मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, वाॅर्ड रचना, आरक्षण आणि मतदार याद्या तयार करणे आदी कामांसाठी लागणार वेळ पाहात या निवडणुका चार महिन्यात घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच टप्प्याटप्प्याने निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने केली आहे. त्यातही जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीचा बार हा दिवाळीनंतरच उडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

महायुती एकत्र लढणार

आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका महायुतीमधील पक्ष स्वबळावर लढणार असल्याची चर्चा होती. मात्र, वर्धा येथे झालेल्या भाजपच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका भाजप महायुतीसोबत एकत्र लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. तसेच जेथे एकमत होत नाही तेथे मैत्रीपूर्ण लढतीचा विचार केला जाईल ते स्थानिक समीकरणावरून ठरवण्यात येईल, असे देखील फडणवीस म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

न्हावरे येथे विवाहितेला शिवीगाळ व मारहाण; पती, सासू-सासऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): न्हावरे (ता. शिरुर) येथील शेंडगेवस्ती परिसरात एका २३ वर्षीय विवाहित महिलेला फोनवर…

44 मिनिटे ago

जनतेच्या विश्वासाचा बुलंद कौल; विकासाच्या राजकारणावर एकनाथ शिंदेंची मजबूत छाप

मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…

10 तास ago

वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाचा कालवा फोडला; अनधिकृत सायपनद्वारे पाणी वळवल्याचा आरोप

सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…

10 तास ago

शालार्थ घोटाळ्यात मोठे रॅकेट उघड; शिक्षकांकडून 20 लाख, पगारातील अर्धी रक्कमही वसूल

बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…

1 दिवस ago

दुधातील भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंचा नागरिकांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…

1 दिवस ago

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…

1 दिवस ago