संभाजीनगर: गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका रखडल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या निवडणुका नेमक्या कधी होणार याची मोठी माहिती समोर आली आहे.
छत्रपती संभाजी नगर येथे राज्य निवडणूक आयोगाची स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या दृष्टिने आढाव बैठक पार पाडली. या बैठकीत निवडणुका कधी होणार याची संकेत देण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाकडील मनुष्यबळ आणि साधनसामुग्रीचा विचार करता एकाच टप्प्यात या निवडणूक घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने निवडणूक होणार आहे. त्यामध्ये सर्वप्रथम ऑक्टोबर महिन्यात पंचायत समिती आणि नगर परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बार उडणार आहे.
जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक देखील एकत्र घेणे शक्य नसल्याने डिसेंबर महिन्यास सर्व महापालिकांची निवडणूक होणार असल्याचा अंदाज आहे. साधारण दोन ते तीन टप्प्यांमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. ऑक्टोबरमध्ये पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीचा बार दिवाळीनंतरच
मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, वाॅर्ड रचना, आरक्षण आणि मतदार याद्या तयार करणे आदी कामांसाठी लागणार वेळ पाहात या निवडणुका चार महिन्यात घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच टप्प्याटप्प्याने निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने केली आहे. त्यातही जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीचा बार हा दिवाळीनंतरच उडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
महायुती एकत्र लढणार
आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका महायुतीमधील पक्ष स्वबळावर लढणार असल्याची चर्चा होती. मात्र, वर्धा येथे झालेल्या भाजपच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका भाजप महायुतीसोबत एकत्र लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. तसेच जेथे एकमत होत नाही तेथे मैत्रीपूर्ण लढतीचा विचार केला जाईल ते स्थानिक समीकरणावरून ठरवण्यात येईल, असे देखील फडणवीस म्हणाले.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…