महाराष्ट्र

निवडणुकीचा अखेर मुहूर्त ठरला! नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद अन् महापालिका निवडणूक एकत्र

संभाजीनगर: गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका रखडल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या निवडणुका नेमक्या कधी होणार याची मोठी माहिती समोर आली आहे.

छत्रपती संभाजी नगर येथे राज्य निवडणूक आयोगाची स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या दृष्टिने आढाव बैठक पार पाडली. या बैठकीत निवडणुका कधी होणार याची संकेत देण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाकडील मनुष्यबळ आणि साधनसामुग्रीचा विचार करता एकाच टप्प्यात या निवडणूक घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने निवडणूक होणार आहे. त्यामध्ये सर्वप्रथम ऑक्टोबर महिन्यात पंचायत समिती आणि नगर परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बार उडणार आहे.

जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक देखील एकत्र घेणे शक्य नसल्याने डिसेंबर महिन्यास सर्व महापालिकांची निवडणूक होणार असल्याचा अंदाज आहे. साधारण दोन ते तीन टप्प्यांमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. ऑक्टोबरमध्ये पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीचा बार दिवाळीनंतरच

मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, वाॅर्ड रचना, आरक्षण आणि मतदार याद्या तयार करणे आदी कामांसाठी लागणार वेळ पाहात या निवडणुका चार महिन्यात घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच टप्प्याटप्प्याने निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने केली आहे. त्यातही जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीचा बार हा दिवाळीनंतरच उडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

महायुती एकत्र लढणार

आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका महायुतीमधील पक्ष स्वबळावर लढणार असल्याची चर्चा होती. मात्र, वर्धा येथे झालेल्या भाजपच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका भाजप महायुतीसोबत एकत्र लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. तसेच जेथे एकमत होत नाही तेथे मैत्रीपूर्ण लढतीचा विचार केला जाईल ते स्थानिक समीकरणावरून ठरवण्यात येईल, असे देखील फडणवीस म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

4 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

4 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

4 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

4 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

4 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

4 तास ago