रोजच्यारोज आपल्याकडूनच काही चूका होतात आणि त्यामुळे मग घरात खूप निगेटीव्ह वाटायला लागतं त्यामुळेच जर आपण आपल्या वागण्यात काही बदल केले तर आपोआपच निगेटीव्ह वाटणारं घर सकारात्मक उर्जा देणारं होऊन जाईल.
आठवड्यातून एकदा तुमच्या घरातले निरुपयोगी सामान घराबाहेर काढा. बंद पडलेली घड्याळं, अन्य वस्तू एकतर दुरुस्त करा किंवा घराबाहेर काढा. घरातला पसारा कमी करा. जेवढा पसारा कमी कराल तेवढं घर अधिक प्रशस्त, छान वाटेल.
ही गोष्ट अगदी योग्यच आहे. कारण घरात जर खूप पसारा असेल, घर आवरलेलं, स्वच्छ, टापटीप नसेल तर आपोआपच घरात खूप अस्वस्थ होतं. पसारा पाहून चिडचिड होते, वैताग येतो. तेच जर तुम्ही स्वच्छ आवरलेल्या घरात बसला तर तुम्हाला छान प्रसन्न वाटतं. तिथे जास्त वेळ बसाव असं वाटतं.
दुसरा उपाय म्हणजे घरात कायम सुगंध दरवळत असावा. यासाठी तुम्ही धूप, उदबत्ती, कापूर अशा गोष्टींचा वापर करू शकता किंवा रूम फ्रेशनर वापरू शकता. यामागचं साधं- सोपं लॉजिक असं की दुर्गंधी असणाऱ्या ठिकाणी आपण बसू शकत नाही. जिथे छान सुगंधी वातावरण असेल तिथे आपोआप मन रमतं. प्रसन्न वाटतं.
तिसरा उपाय म्हणजे आठवड्यातून एकदा फरशी पुसण्याच्या पाण्यात रॉक सॉल्ट घालून त्याने फरशी पुसा. यामागचं विज्ञान असं की मीठ हे किटकनाशक आहे. मिठामुळे अनेक जंतू दूर होतात. त्यामुळे घर स्वच्छ होण्यासाठी, घरातले सुक्ष्म जंतू घालवून टाकण्यासाठी आठवड्यातून एकदा रॉक सॉल्टचा उपयोग करावा.. स्वच्छ, चकाचक घर असेल तर ते कोणालाही आवडतंच.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…