रोजच्यारोज आपल्याकडूनच काही चूका होतात आणि त्यामुळे मग घरात खूप निगेटीव्ह वाटायला लागतं त्यामुळेच जर आपण आपल्या वागण्यात काही बदल केले तर आपोआपच निगेटीव्ह वाटणारं घर सकारात्मक उर्जा देणारं होऊन जाईल.
आठवड्यातून एकदा तुमच्या घरातले निरुपयोगी सामान घराबाहेर काढा. बंद पडलेली घड्याळं, अन्य वस्तू एकतर दुरुस्त करा किंवा घराबाहेर काढा. घरातला पसारा कमी करा. जेवढा पसारा कमी कराल तेवढं घर अधिक प्रशस्त, छान वाटेल.
ही गोष्ट अगदी योग्यच आहे. कारण घरात जर खूप पसारा असेल, घर आवरलेलं, स्वच्छ, टापटीप नसेल तर आपोआपच घरात खूप अस्वस्थ होतं. पसारा पाहून चिडचिड होते, वैताग येतो. तेच जर तुम्ही स्वच्छ आवरलेल्या घरात बसला तर तुम्हाला छान प्रसन्न वाटतं. तिथे जास्त वेळ बसाव असं वाटतं.
दुसरा उपाय म्हणजे घरात कायम सुगंध दरवळत असावा. यासाठी तुम्ही धूप, उदबत्ती, कापूर अशा गोष्टींचा वापर करू शकता किंवा रूम फ्रेशनर वापरू शकता. यामागचं साधं- सोपं लॉजिक असं की दुर्गंधी असणाऱ्या ठिकाणी आपण बसू शकत नाही. जिथे छान सुगंधी वातावरण असेल तिथे आपोआप मन रमतं. प्रसन्न वाटतं.
तिसरा उपाय म्हणजे आठवड्यातून एकदा फरशी पुसण्याच्या पाण्यात रॉक सॉल्ट घालून त्याने फरशी पुसा. यामागचं विज्ञान असं की मीठ हे किटकनाशक आहे. मिठामुळे अनेक जंतू दूर होतात. त्यामुळे घर स्वच्छ होण्यासाठी, घरातले सुक्ष्म जंतू घालवून टाकण्यासाठी आठवड्यातून एकदा रॉक सॉल्टचा उपयोग करावा.. स्वच्छ, चकाचक घर असेल तर ते कोणालाही आवडतंच.
(सोशल मीडियावरून साभार)
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…
जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…
पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…
मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…