महाराष्ट्र

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची गाजलेली भाषणे आजही प्रेरणादायी

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला अधिकृत सुरुवात झाली असून, या निमित्ताने त्यांच्या प्रभावी आणि परखड भाषणांची पुन्हा एकदा आठवण करून दिली जात आहे. बाळासाहेबांची भाषणे आजही लाखो शिवसैनिक आणि मराठी माणसासाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना, “बाळासाहेब म्हणजे तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणी” अशा शब्दांत गौरव केला. मोदींवरही बाळासाहेबांच्या भाषणांचा खोल प्रभाव असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच आपल्या वडिलांकडून मिळालेल्या आत्मबळ आणि आत्मविश्वासाच्या मंत्राचा उल्लेख केला. “शिवसैनिक हीच माझी खरी ताकद आहे. शिवसैनिकांशिवाय मी स्वतःला शिवसेनाप्रमुख मानू शकत नाही,” असे ते अनेक भाषणांत ठामपणे सांगत असत.

मुंबईत मराठी माणसाचा कणा ताठ करण्याचे काम शिवसेनेने केल्याचा अभिमान बाळासाहेबांनी व्यक्त केला होता. “शिवसेना नसती, तर मराठी माणूस मुंबईतून फेकला गेला असता,” असे परखड विधान त्यांनी केले होते. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येऊन पक्षाशी गद्दारी करणाऱ्या आमदार-खासदारांनाही त्यांनी कडक शब्दांत इशारा दिला होता.

मराठी तरुणांनी केवळ नोकऱ्या मागणारे नव्हे, तर नोकऱ्या देणारे उद्योजक बनावे, अशी त्यांची अपेक्षा होती. मुंबईला सिंगापूर, हाँगकाँग किंवा मलेशियासारखे सुंदर शहर बनवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. मात्र शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नागरिकांचीही असल्याचे ते स्पष्टपणे सांगत.

हिंदुस्तान हे हिंदू राष्ट्रच आहे आणि त्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही, असे मत बाळासाहेबांनी वारंवार मांडले. तसेच गांधी घराण्याच्या राजकारणावर टीका करत, नेहरूंच्या धोरणांमुळेच काश्मीर प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याचा आरोपही त्यांनी केला होता. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, भाषणे आणि त्यांचा वारसा पुन्हा एकदा जनतेसमोर येत असून, ते आजच्या पिढीसाठीही दिशादर्शक ठरत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

२१ ऑगस्ट ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा होणार; सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला राज्याचा गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी राज्यभर 'जलसंधारण…

3 तास ago

मुंबई विद्यापीठाच्या एलएलबी निकालातील घोटाळ्यावर सत्यजीत तांबे आक्रमक

29 विद्यार्थ्यांना शून्य गुण देणाऱ्यांवर कारवाईची मागणी मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या तीन वर्षांच्या एलएलबी अंतिम वर्षाच्या…

3 तास ago

इथेनॉल धोरणावर काँग्रेसचे प्रश्न; वाहनधारकांच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन (E20) धोरणावर गंभीर प्रश्न…

3 तास ago

पाण्याचे महत्व

1) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे. २) दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी पिणे…

3 तास ago

दातांचे दुखणे वाढले, किचनमधील या वस्तूंचा करा वापर

लवंग दातासाठी प्रभावी ठरते. लोंगची पावडर करुन त्यात मीठ मिक्स करा. हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी…

3 तास ago

उत्तम आरोग्य म्हणजे काय

जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने उत्तम आरोग्य म्हणजे फक्त व्याधी, आजार मुक्त शरीरच नव्हे तर शारीरिक,…

3 तास ago