महाराष्ट्र

शहरांच्या बकालपणाला सरकारच जबाबदार; काँग्रेसचा ‘शहर परिवर्तन गट’ २० ऑगस्टपासून मैदानात

मुंबई: राज्यात झपाट्याने वाढणाऱ्या शहरीकरणाच्या तुलनेत पायाभूत सुविधा निर्माण करण्यात सरकार व महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. योग्य नियोजनाअभावी राज्यातील अनेक शहरे बकाल होत असून नागरिकांना रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य, शिक्षण, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, पार्किंग आणि प्रदूषण यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केला आहे.

शहर विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असला, तरी शहरांच्या मूलभूत गरजा अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत, असा दावा काँग्रेसने केला आहे. या पार्श्वभूमीवर शहरांच्या गरजा समजून घेऊन नियोजनबद्ध विकासासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ‘शहर परिवर्तन गट’ स्थापन केला आहे.

या मोहिमेचे उद्घाटन २० ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रांत करण्यात येणार आहे. माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महानगरपालिका क्षेत्रांमध्ये पत्रकार परिषदा घेण्यात येणार असून, यावेळी ‘शहर परिवर्तन गटाच्या’ आगामी कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर केली जाणार आहे.

या गटाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, तेलंगणाचे सहप्रभारी आणि वरिष्ठ प्रवक्ते सचिन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर संग्राम खोपडे यांच्याकडे गटाच्या समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

शहरांमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, त्यावर उपाययोजना सुचवणे आणि शहर विकासासाठी ठोस पर्याय मांडणे, या उद्देशाने ‘शहर परिवर्तन गट’ काम करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करून सामाजिक कार्यात सहभागी व्हावे; चंद्रकांत पाटील

मुंबई: विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचा सदुपयोग विधायक कामांसाठी करत सामाजिक जाणीव जोपासावी. समाजाच्या गरजा तसेच स्वतःची…

1 तास ago

मुंबईत फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेण्याची संधी; जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम

मुंबई : जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड…

1 तास ago

वंदे मातरमच्या वादावरून भाजपवर सपकाळांचा निशाणा; ‘हिंदू-मुस्लीम वाद उकरण्याचे षडयंत्र’

मुंबई: देशातील राजकीय वातावरण बदलले असून जनता आता भाजपा-मोदी-शाह सरकारला प्रश्न विचारत आहे. त्यामुळे सरकार घाबरले…

1 तास ago

उबाठाला मोठा धक्का! सोशल मीडिया विभागातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा शिवसेना संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या…

1 तास ago

जुन्नरमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

मुंबई: जुन्नर तालुक्यात अल्पवयीन मुलीबाबत घडलेली घटना अत्यंत गंभीर आणि संतापजनक असून, मुलींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड…

2 तास ago

सीओईपीच्या शुल्क रचनेत सुधारणा; विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क परताव्याचा अधिक लाभ मिळणार

मुंबई : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्क रचनेत सुधारणा…

2 तास ago