महाराष्ट्र

मुलाच्या आत्महत्येच सहन न झाल्याने आईने उचलल भयानक पाऊल!

पालघर: राज्यात गुन्हेगारी तसेच आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राज्यातील विविध भागातून आत्महत्येच्या घटना उघडकीस येत आहेत. आता पालघर जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुलाने केलेल्या आत्महत्येचं दुःख सहन न झाल्याने एका महिलेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण – मुलाने केलेल्या आत्महत्येचे दुःख सहन न झाल्याने आईनेही विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पालघरमध्ये घडला आहे.

पालघरमधील सफाळे येथील कांद्रेभुरे येथे ही घटना घडली असून शैलेश पाटील या 26 वर्षीय तरुणाने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बातमी कळताच शैलेशची आई कल्पना पाटील हिने देखील गावातील विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली. मृत शैलेश याची व्हॉट्सअॅपला एका मुलीसोबत मैत्री झाली होती. तसेच तो सेक्सटोर्शनचा बळी ठरल्याचा अंदाज शैलेशच्या निकटवर्तीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, आता मुलाच्या आत्महत्येचं दु:ख सहन न झाल्याने या महिलेनेही आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर आत्महत्या केलेला मुलगा शैलेश याच्याजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे

दरम्यान, कल्पना यांच्या पतीने आणि त्यांच्या मुलीने पोलिस किंवा हॉस्पिटलला न कळवता दोघांचेही अंत्यसंस्कार केले. त्यामुळे कुटुंबातील या दोन्ही सदस्यांनी आत्महत्या का केली आणि अंतिम संस्कारापूर्वी कुटुंबीयांनी पोलिसांना याची माहिती का दिली नाही, याचा तपास सुरु केला आहे, अशी माहितीही केळवा पोलिसांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सणसवाडीत ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल, दोन सराईत चोरटे अटकेत

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…

1 तास ago

महाराष्ट्राला ‘समग्र शिक्षा’त अधिक निधी द्या; केंद्रीय परिषदेत दादाजी भुसे यांची जोरदार मागणी

मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…

1 तास ago

विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग; हे विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेलं निष्ठूर सरकार; विजय वडेट्टीवार

सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…

1 तास ago

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

18 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

18 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

18 तास ago