महाराष्ट्र

सहा खासदारांची बंडखोरी म्हणजे जनतेशी व महाविकास आघाडीशी विश्वासघात; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी केलेली बंडखोरी ही केवळ उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशीच नव्हे, तर महाविकास आघाडीशी आणि जनतेशीही केलेली गद्दारी असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. महायुतीच्या विरोधात जनतेने मतदान करून या खासदारांना विजयी केले होते. त्यामुळे त्यांच्या या कृतीला जनतेचा विश्वासघात मानत अशा गद्दारांना भविष्यात जनता धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी दिला.

प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले की, बंडखोरी करणारे हे सहा खासदार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे प्रचार केला, कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी न पडता जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला. मात्र आता त्यांनी केलेली बंडखोरी हा त्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा अपमान आहे.

“पैशासाठी लाचार झालेले लोक जनतेची सेवा करू शकत नाहीत. ज्यांना फक्त पैशाचे आकर्षण असते, ते कोणाचेही नसतात,” अशी टीकाही सपकाळ यांनी केली.

यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार हल्लाबोल केला. लोकशाही आणि संविधानिक मूल्ये पायदळी तुडवत भाजप ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकांमध्ये पैसा आणि सत्तेचा गैरवापर होत असून, विजय मिळवता आला नाही तर विजयी उमेदवारांना विकत घेण्याचा किंवा निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले.

देशातील लोकशाही संस्थांवर दबाव निर्माण झाला असून विधिमंडळ, संसद आणि न्यायव्यवस्थेतही न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करत, सर्व संस्थांवर भाजपने कब्जा केल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. दहशतीच्या जोरावर राज्यकारभार सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

6 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

7 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

11 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

11 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

11 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

11 तास ago