राज्यात ६६.२८ टक्के मतदान
मुंबई: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज, सोमवारी जाहीर होणार आहेत. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे.
या निवडणुकीसाठी एकूण ७ हजार ४३८ उमेदवार रिंगणात होते. राज्यभरातील २५ हजार मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती, त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीकडे विशेष लक्ष दिले जात होते.
अखेर राज्य निवडणूक आयोगाने रविवारी अंतिम मतदान आकडेवारी जाहीर केली असून, राज्यात सरासरी ६६.२८ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. एकूण १ कोटी ४१ लाख ९० हजार २११ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
परभणीमध्ये सर्वाधिक मतदान
राज्यातील सर्वाधिक मतदान परभणी जिल्ह्यात झाले असून, येथील ९ पंचायत समित्यांसाठी ७४.८९ टक्के मतदान झाले आहे. त्याखालोखाल कोल्हापूर (७४.४५ टक्के) आणि छत्रपती संभाजीनगर (७२.६९ टक्के) जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.
जिल्हानिहाय मतदान टक्केवारी
रायगड – ६९.९१%
रत्नागिरी – ५५.७९%
सिंधुदुर्ग – ६१.९८%
पुणे – ६८.३५%
सातारा – ६७.८०%
सांगली – ६९.७६%
सोलापूर – ६५.९०%
कोल्हापूर – ७४.४५%
छत्रपती संभाजीनगर – ७२.६९%
परभणी – ७४.८९%
धाराशिव – ६५.२२%
लातूर – ६३.७९%
तीन जिल्ह्यांत ७० टक्क्यांहून अधिक मतदान
जिल्हा परिषद निवडणुकीत कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या तीन जिल्ह्यांत ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. तर, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे ५५.७९ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.
आज जाहीर होणारे निकाल स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारे ठरणार असून, प्रमुख पक्षांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…
मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…