राज्यात ६६.२८ टक्के मतदान
मुंबई: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज, सोमवारी जाहीर होणार आहेत. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे.
या निवडणुकीसाठी एकूण ७ हजार ४३८ उमेदवार रिंगणात होते. राज्यभरातील २५ हजार मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती, त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीकडे विशेष लक्ष दिले जात होते.
अखेर राज्य निवडणूक आयोगाने रविवारी अंतिम मतदान आकडेवारी जाहीर केली असून, राज्यात सरासरी ६६.२८ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. एकूण १ कोटी ४१ लाख ९० हजार २११ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
परभणीमध्ये सर्वाधिक मतदान
राज्यातील सर्वाधिक मतदान परभणी जिल्ह्यात झाले असून, येथील ९ पंचायत समित्यांसाठी ७४.८९ टक्के मतदान झाले आहे. त्याखालोखाल कोल्हापूर (७४.४५ टक्के) आणि छत्रपती संभाजीनगर (७२.६९ टक्के) जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.
जिल्हानिहाय मतदान टक्केवारी
रायगड – ६९.९१%
रत्नागिरी – ५५.७९%
सिंधुदुर्ग – ६१.९८%
पुणे – ६८.३५%
सातारा – ६७.८०%
सांगली – ६९.७६%
सोलापूर – ६५.९०%
कोल्हापूर – ७४.४५%
छत्रपती संभाजीनगर – ७२.६९%
परभणी – ७४.८९%
धाराशिव – ६५.२२%
लातूर – ६३.७९%
तीन जिल्ह्यांत ७० टक्क्यांहून अधिक मतदान
जिल्हा परिषद निवडणुकीत कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या तीन जिल्ह्यांत ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. तर, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे ५५.७९ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.
आज जाहीर होणारे निकाल स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारे ठरणार असून, प्रमुख पक्षांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…
पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…
घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…
व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…
लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…