पुणे: शहापूर तालुक्यातील वाशाळा ते कसारा हा महत्त्वाचा ग्रामीण रस्ता अधिकारी–ठेकेदारांच्या मिलीभगतीमुळे अक्षरशः चाळण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. माळशेज घाटमार्गे पुणे शहराला जोडणारा हा रस्ता तब्बल १७ शाळांना जोडतो. मात्र नागमोडी वळणे, तीव्र चढ-उतार आणि खोल खड्ड्यांमुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून कालावधी संपत आला असतानाही एप्रिल २०२५ पासून ठेकेदाराने काम बंद ठेवल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. वाशाळा, वेळूक, ढाकणे, कोथळे, फुगाळे, कलभोंडा, कोठारे, तलवाडा आणि डोळखांब ग्रामपंचायतींसह अनेक गाव-पाड्यांसाठी हा एकमेव मार्ग असल्याने संताप तीव्र झाला आहे.
या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी मुंबई-नाशिक महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या
रखडलेले रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे
तीव्र वळणे व चढ-उतार कमी करून सुरक्षितता वाढवावी
धोकादायक झाडेझुडपे हटवून रस्ता मोकळा करावा
पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे व मोऱ्यांची व्यवस्था करावी
नवीन पुलाचे अंतर व उंची वाढवावी
भावली धरण योजनेचे काम रस्त्याला अडथळा ठरणार नाही याची दक्षता घ्यावी
मंजूर रुंदी कायम ठेवून संरक्षण भिंतीची मजबुती सुनिश्चित करावी
ही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे तालुकाप्रमुख बाळा धानके यांनी प्रशासनाकडे केली आहे.
अपघातांची मालिका; ग्रामस्थ संतप्त
नादुरुस्त रस्त्यामुळे गेल्या महिन्यात जांभूळवाड येथील एका युवकाचा अपघातात मृत्यू झाला. टोकरखांड येथील एका शिक्षकाला अपघातात कायमचे अपंगत्व आले असून सोबतची शिक्षिका गंभीर जखमी झाली. चिंध्याची वाडी येथील युवकही अपघातामुळे कायमचा अपंग झाल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या पाच वर्षांत झालेल्या अपघातांची संख्या मोजणेही कठीण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून तातडीने ठोस उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वीजबिल, माहितीचा अधिकार आणि तक्रार निवारणावर 'स्टेट ड्राईव्ह'मधून उपस्थित झाले प्रश्न मुंबई: राज्यात स्मार्ट मीटरच्या…
मुंबई विद्यापीठाबाहेर तीव्र आंदोलन; केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप, मिलिंद अण्णा कांबळे यांचा इशारा मुंबई: दिल्लीतील…
राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव यांना आधी निमंत्रण द्या; बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत शिंदेंची…
मुंबई: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या…
छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातारा परिसरात भाऊबंदकीचा वाद आणि राजकीय वैमनस्यातून कथित अघोरी पूजा…
२०१९ नंतरच्या राजकीय घडामोडींवर समर्थकांच्या दृष्टिकोनातून सविस्तर मतप्रदर्शन मुंबई: राष्ट्रीय सह समन्वयक व प्रसार माध्यम…