मुंबई: वाढती महागाई, बेरोजगारी आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर आमदार-खासदारांना मिळणाऱ्या विशेष सुविधा आणि शासकीय खर्चावर तीव्र टीका करणारा लेख सध्या चर्चेत आला आहे. “जनतेचा पैसा जनतेसाठी की सत्ताधाऱ्यांच्या सुखसोयींसाठी?” असा थेट सवाल उपस्थित करत सत्ताधाऱ्यांच्या विशेषाधिकारांवर मर्यादा आणण्याची मागणी करण्यात आली आहे.
लेखात पेट्रोल, गॅस, वीज, शिक्षण आणि औषधांच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य नागरिकांचे जीवन कठीण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. एका बाजूला शेतकरी कर्जबाजारी होत असून बेरोजगार तरुण नोकरीसाठी भटकत आहेत, तर दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधींना मोफत बंगले, वीज, पाणी, प्रवास, सुरक्षा, वैद्यकीय सुविधा आणि आजीवन पेन्शन दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“जनतेने टोल भरायचा आणि जनप्रतिनिधींना टोलमाफी का?” असा प्रश्न उपस्थित करत संसद कॅन्टीनमधील स्वस्त दर, परदेश दौऱ्यांवरील खर्च, सरकारी वाहनांचा वापर आणि अवाजवी सुरक्षा ताफ्यांवरही निशाणा साधण्यात आला आहे.
लेखात आमदार-खासदारांचे विशेष भत्ते, मोफत निवास व्यवस्था, अमर्याद प्रवास सुविधा, आजीवन पेन्शन आणि इतर शासकीय सवलती तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. “देशभक्ती म्हणजे घोषणाबाजी नव्हे, तर स्वतःच्या सुविधांवर मर्यादा आणून जनतेसाठी त्याग करणे,” असे मतही व्यक्त करण्यात आले आहे.
दरम्यान, या भूमिकेमुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, जनतेच्या पैशाच्या वापराबाबत अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची मागणी जोर धरत आहे.
'पक्षापेक्षा नियम मोठे, भावनेपेक्षा परंपरा मोठी'; उपसभापती म्हणून सर्वांना समान न्याय देण्याचा विश्वास मुंबई: राज्य…
मुंबई: नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा बोर्डाची तातडीने पुनर्स्थापना करावी आणि…
पचन सुधारते आलं पाचक रस वाढवतं, गॅस व अपचन कमी करतं दाहशामक (Anti-inflammatory) सांधेदुखी, स्नायू…
झोप ही प्रत्येकालाच आवडते आणि प्रत्येकाची झोपण्याची शैली वेगवेगळी असते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात चांगली झोप…
आपण अस्वस्थ होतो तेव्हा नेहमी शांत राहण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय जेव्हा जखम होते तेव्हा…
छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आयोजित 'एल्गार अन्नदात्याचा' आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश…