महाराष्ट्र

इयत्ता १ ली ते ९ वीच्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक ठरले

भर उन्हात विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहावे लागणार

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) कडून २०२४-२५ शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ५ एप्रिल ते २३ एप्रिल २०२५ दरम्यान सकाळी ८ ते ११ या वेळेत परीक्षा घेतली जाणार असून, यंदा पहिल्यांदाच सर्व शाळांमध्ये परीक्षा एकाच वेळी होणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे

परीक्षा कालावधी: ५ ते २३ एप्रिल २०२५

वेळ: सकाळी ८ ते ११

निकाल जाहीर: १ मे २०२५

फेरपरीक्षा: जूनमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी

परीक्षेनंतरही शाळा बंधनकारक

यापूर्वी परीक्षा संपल्यानंतर अनेक विद्यार्थी शाळेत येत नसत. मात्र, यंदा २५ एप्रिलपर्यंत शाळेत हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे.

उत्तरपत्रिका तपासणी आणि निकालाची जबाबदारी

५ वी ते ८ वीच्या उत्तरपत्रिका जतन कराव्या लागणार, कारण त्यांची डायट किंवा शिक्षण विभागाकडून तपासणी केली जाऊ शकते.

परीक्षा कोणत्या दिवशी, कोणता विषय 

७ एप्रिल: नववीचा इंग्रजी विषयाचा पेपर

८ एप्रिल: पाचवी, सहावी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी (पॅटर्न) परीक्षा

९ एप्रिल: सहावीचा गणित, आठवी व नववीचा इंग्रजी (पॅटर्न) पेपर

११ एप्रिल: सहावी व नववीचा इंग्रजी पेपर, आठवीचा गणित (पॅटर्न) पेपर

१२ एप्रिल: सर्व वर्गांसाठी इंग्रजी, हिंदी आणि गणित परीक्षा

१५ एप्रिल: सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान आणि गणिताचा पेपर

१६ एप्रिल: सहावीच्या समाजशास्त्र, आठवीच्या गणित आणि नववीच्या विज्ञान भाग-१ ची परीक्षा

१७ एप्रिल: पाचवीच्या परिसर अभ्यास, सहावीच्या चित्रकला, आठवीच्या हिंदी आणि नववीच्या विज्ञान भाग-२ ची परीक्षा

१९ एप्रिल: सहावीच्या गणित (पॅटर्न), आठवीच्या विज्ञान, नववीच्या गणित भाग-२ (पॅटर्न) परीक्षा

२१ एप्रिल: सहावीच्या गणित (पॅटर्न), आठवीच्या समाजशास्त्र, नववीच्या हिंदी विषयाची परीक्षा

२२ एप्रिल: पाचवी व सहावीच्या शालेय शिक्षण, आठवीच्या चित्रकला, नववीच्या इतिहासाची परीक्षा

२३ एप्रिल: सहावीच्या इंग्रजी (पॅटर्न), आठवीच्या शालेय शिक्षण, नववीच्या भूगोलाची परीक्षा

परीक्षेचा निकाल १ मे रोजी लावावा लागणार असल्याने शिक्षकांना त्वरित उत्तरपत्रिका तपासून निकाल तयार करावा लागेल.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जूनपूर्वी फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात शेतकऱ्याची हत्या; परिसरात खळबळ…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रहिवासी व व्यवसायाने शेतकरी असलेले बाळासाहेब बबन तांबे यांचा…

10 मिनिटे ago

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

21 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

1 दिवस ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago