शिरुर (अरुणकुमार मोटे): शहरातील पाच कंदील चौकात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. येथील अनधिकृत बांधकामांमुळे पार्किंगसाठी जागाच शिल्लक राहिली नाही. परिणामी, वाहनधारकांना रस्त्यावरच गाड्या उभ्या कराव्या लागतात आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. या समस्येमुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
ही गंभीर समस्या सोडवण्या साठी श्रीराम सेना अध्यक्ष सुनील जाधव, उपाध्यक्ष स्वप्निल रेड्डी आणि मनसे तालुका संघटक अविनाश घोगरे यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. त्यांनी “HDFC बँकेच्या पार्किंगमधून चारचाकी किंवा दुचाकी गाडी काढून दाखवा आणि रोख बक्षीस जिंका!” असे आव्हान दिले. या आव्हानातून पार्किंग संकट किती गंभीर आहे हे स्पष्ट होते.
या भागात आधीच दोन बँका कार्यरत असून, आता आणखी एका बँकेसाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र, इमारतीखालील जागा पार्किंगसाठी न ठेवता व्यापाऱ्यांसाठी गाळे तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे. व्यापाऱ्यांना ग्राहकांच्या कमतरतेचा आणि वाहनधारकांना सतत होणाऱ्या दंडात्मक कारवाईचा त्रास सहन करावा लागत आहे.
नगरपरिषद आणि प्रशासनाने अद्यापही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी आता लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबत आमदार माऊली कटके यांनाही लेखी निवेदन देण्यात आले आहे.
शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर तत्काळ तोडगा काढावा!
येत्या काळात जर प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर वाहतूक व्यवस्थेचा पूर्णत: बोजवारा उडण्याची शक्यता आहे. नागरिक आणि व्यापारी वर्ग यामुळे संतप्त असून, प्रशासनाने त्वरित कारवाई करून अनधिकृत बांधकामे हटवावीत आणि पार्किंगची सोय करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…