भावाच्या अंत्यदर्शनाला आलेली बहीणही काळाच्या पडद्याआड

कणेगाव: वाळवा तालुक्यातील कणेगाव येथे एका पाठोपाठ घडलेल्या दोन मृत्यूंनी संपूर्ण गाव हादरून गेले आहे. सत्तर वर्षांचे राजेंद्र गोविंद पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या बहिणीचाही दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे कणेगावसह बोरगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

कणेगावचे रहिवासी राजेंद्र गोविंद पाटील (वय 70) यांची काही दिवसांपासून प्रकृती खालावली होती. शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधीसाठी नातेवाईक, भावकी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी त्यांची बहिण उर्मिला (वय 72) या पती उध्दव शिंदे यांच्यासह बोरगाव येथून कणेगावला आल्या होत्या. भावाचे शेवटचे दर्शन घेताना त्या भावनिक झाल्या होत्या. कितीही वय झाले तरी माहेरचा आधार गमावल्याची जाणीव त्यांच्या डोळ्यांतून स्पष्ट दिसत होती.

अंत्यसंस्कारानंतर रात्री सुमारे अकरा वाजता उर्मिला शिंदे या पती व इतरांसह कारमधून बोरगावकडे निघाल्या. गावाबाहेर असलेल्या स्मशानभूमीजवळ येताच अचानक रस्त्यालगत उभे असलेले भलेमोठे झाड कोसळले. ते झाड थेट त्यांच्या कारवर पडले.

या भीषण अपघातात उर्मिला शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. पती उध्दव शिंदे, वाहनचालक आणि सोबत असलेली एक महिला गंभीर जखमी झाले. झाड कोसळल्याचा मोठा आवाज ऐकताच ग्रामस्थ घटनास्थळी धावले. जखमींना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उर्मिला शिंदे यांना वाचवता आले नाही.

भावाच्या अंत्यसंस्काराला आलेली बहीण अशा दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडल्याने संपूर्ण कणेगाव सुन्न झाले आहे. उर्मिला शिंदे यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. या दुहेरी शोकांतिकेने कणेगाव आणि बोरगाव परिसरावर दुःखाचे सावट पसरले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

31 मिनिटे ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

2 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे; उपाध्यक्षपदी सुनिल जिते यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

3 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

3 तास ago

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…

3 तास ago

फडणवीसांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कार द्यावा; मोदी सरकारच्या दाव्यांवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…

3 तास ago