मुंबई: राज्य सरकारने 14 मार्च 2024 रोजी अधिसूचना जारी करत गुंठेवारी खरेदी-विक्रीला मंजुरी दिली आहे. यामुळे नागरिकांना आता पूर्वी अडकलेले जमिनीचे व्यवहार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
काय करावे लागेल
पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या रेडिरेकनरच्या 5% रक्कम शासनाला शुल्क म्हणून भरावी लागेल.
त्यानंतर त्या जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार अधिकृतरित्या करता येईल.
या तीन कारणांसाठी मिळेल परवानगी:
विहिरीसाठी गुंठेवारी खरेदी-विक्रीस परवानगी.
शेती किंवा रस्त्यासाठी जमिनीचा व्यवहार करता येईल.
घर बांधण्यासाठी गुंठेवारी जमिनीचा खरेदी-विक्रीस मार्ग मोकळा
अधिक तपशील
1947 मध्ये लागू झालेल्या तुकडेबंदी कायद्यामुळे कमी क्षेत्रफळाच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध होते. 2017 मध्ये बाजारमूल्याच्या 25% शुल्क आकारण्याची अट घालण्यात आली होती, जी सर्वसामान्यांसाठी कठीण होती. परंतु, आता 5% शुल्क भरून जमीन नियमित करण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.
महत्त्वाचे:
एक, दोन, तीन, चार किंवा पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करता येणार.
नगरपालिका, महानगरपालिका किंवा ग्रामीण भागातील प्रांताधिकाऱ्यांकडून गुंठेवारी नियमित केल्याचा दाखला घ्यावा लागेल.
गुंठेवारी जमीन खरेदी-विक्री नियमित करण्यासाठी, संबंधित अर्ज खालीलप्रमाणे सादर करावा
शहरी भागासाठी: नगरपालिका किंवा महानगरपालिकेतील संबंधित विभागाकडे अर्ज सादर करावा.
ग्रामीण भागासाठी: संबंधित प्रांताधिकाऱ्यांच्या (Sub-Divisional Officer) कार्यालयात अर्ज द्यावा.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे:
पूर्वीच्या व्यवहाराच्या (दस्त) रेडिरेकनरच्या 5% रक्कम शासनाला शुल्क म्हणून भरल्याचे प्रमाणपत्र.
विहिरीसाठी अर्ज करताना, भूजल सर्वेक्षण आणि विकास अभिकरणाने दिलेले ना-हरकत प्रमाणपत्र.
शेतरस्त्यासाठी अर्ज करताना, रस्त्याचा कच्चा नकाशा.
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…
महेश तपासे यांचा सवाल; परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि महिला आरक्षणावरही केंद्रावर टीका मुंबई: पाहलगाम…
मुंबई : KEM Hospital (के.ई.एम. रुग्णालय) चे नाव बदलण्याच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद…
मुंबई: महिला आरक्षण विधेयकाविरोधात भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस खासदार…
मुंबई: काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही असल्याचा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत…
मुंबई: पीसीएम आणि पीसीबी गटातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेत दुसऱ्या प्रयत्नासाठी (Second Attempt) नोंदणी…