महाराष्ट्र

गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा..

मुंबई: राज्य सरकारने 14 मार्च 2024 रोजी अधिसूचना जारी करत गुंठेवारी खरेदी-विक्रीला मंजुरी दिली आहे. यामुळे नागरिकांना आता पूर्वी अडकलेले जमिनीचे व्यवहार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

काय करावे लागेल

पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या रेडिरेकनरच्या 5% रक्कम शासनाला शुल्क म्हणून भरावी लागेल.

त्यानंतर त्या जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार अधिकृतरित्या करता येईल.

या तीन कारणांसाठी मिळेल परवानगी:

विहिरीसाठी गुंठेवारी खरेदी-विक्रीस परवानगी.

शेती किंवा रस्त्यासाठी जमिनीचा व्यवहार करता येईल.

घर बांधण्यासाठी गुंठेवारी जमिनीचा खरेदी-विक्रीस मार्ग मोकळा

अधिक तपशील

1947 मध्ये लागू झालेल्या तुकडेबंदी कायद्यामुळे कमी क्षेत्रफळाच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध होते. 2017 मध्ये बाजारमूल्याच्या 25% शुल्क आकारण्याची अट घालण्यात आली होती, जी सर्वसामान्यांसाठी कठीण होती. परंतु, आता 5% शुल्क भरून जमीन नियमित करण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.

महत्त्वाचे:

एक, दोन, तीन, चार किंवा पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करता येणार.

नगरपालिका, महानगरपालिका किंवा ग्रामीण भागातील प्रांताधिकाऱ्यांकडून गुंठेवारी नियमित केल्याचा दाखला घ्यावा लागेल.

गुंठेवारी जमीन खरेदी-विक्री नियमित करण्यासाठी, संबंधित अर्ज खालीलप्रमाणे सादर करावा

शहरी भागासाठी: नगरपालिका किंवा महानगरपालिकेतील संबंधित विभागाकडे अर्ज सादर करावा.

ग्रामीण भागासाठी: संबंधित प्रांताधिकाऱ्यांच्या (Sub-Divisional Officer) कार्यालयात अर्ज द्यावा.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे:

पूर्वीच्या व्यवहाराच्या (दस्त) रेडिरेकनरच्या 5% रक्कम शासनाला शुल्क म्हणून भरल्याचे प्रमाणपत्र.

विहिरीसाठी अर्ज करताना, भूजल सर्वेक्षण आणि विकास अभिकरणाने दिलेले ना-हरकत प्रमाणपत्र.

शेतरस्त्यासाठी अर्ज करताना, रस्त्याचा कच्चा नकाशा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्याचा बेस्ट घरगुती उपाय

आजकालच्या लाइफ स्टाईलमध्ये शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊन नसा ब्लॉक होणं एक सामान्य समस्या बनली आहे.…

37 मिनिटे ago

लसणाचे औषधी गुणधर्म

लसणाच्या पाकळ्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म…

40 मिनिटे ago

‘आपले राष्ट्र, आपला स्वाभिमान’; शक्तिशाली भारतासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन

एकता, कर्तव्य, युवाशक्ती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून विकसित भारत घडविण्याचा संदेश मुंबई: भारत हा केवळ भौगोलिक…

42 मिनिटे ago

नीट पेपर लीकविरोधात केंद्राच्या कठोर भूमिकेला महाराष्ट्राचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंचे स्वागत

फास्ट ट्रॅक न्यायालये, १० वर्षांपर्यंत कारावास आणि १० कोटी दंडाच्या प्रस्तावित तरतुदींना शिंदेंचा पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या…

58 मिनिटे ago

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणजे लढ्याचा शेवट नाही; मोदींनी देशाची माफी मागावी; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी…

1 तास ago

नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा तरुणाईच्या संघर्षाचा विजय; सचिन सावंत

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत करत अखिल भारतीय…

1 तास ago