महाराष्ट्र

सुनेत्रा पवारांवरील ट्विटचा अपमानाचा हेतू नव्हता; वातावरण तापवण्याचा भाजपचा प्रयत्न; अतुल लोंढे

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर करण्यात आलेल्या ट्विटमध्ये त्यांचा अपमान करण्याचा किंवा त्यांना कमी लेखण्याचा कोणताही हेतू नव्हता, असा दावा काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. काही जण राजकीय फायदा मिळवण्यासाठी या मुद्द्याचे भांडवल करून वातावरण तापवत असल्याची टीकाही त्यांनी केली.

अतुल लोंढे म्हणाले की, हे ट्विट व्यक्तीला उद्देशून नसून समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या संदर्भात वापरलेल्या राजकीय संदर्भातील शब्दाचा उल्लेख होता. मात्र, त्याचा चुकीचा अर्थ लावून वाद निर्माण करण्यात आला.

ते पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे महिलांच्या सन्मानाला सर्वोच्च प्राधान्य देणारे आहेत. बीडमधील पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रश्नांची उत्तरे देऊ न दिल्याच्या पार्श्वभूमीवर हे ट्विट करण्यात आले होते. मात्र, त्यावर हिंसक प्रतिक्रिया उमटल्याने ते ट्विट हटवण्यात आले आणि हर्षवर्धन सपकाळ यांनीही आपल्या सोशल मीडिया हँडलवरून खेद व्यक्त केला.

तरीदेखील हा मुद्दा पुढे रेटला जात असून केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप लोंढे यांनी केला. भाजपची विचारसरणी महिलांना दुय्यम स्थान देणारी असल्याची टीका करत त्यांनी एका ट्विटच्या निमित्ताने राज्यातील वातावरण गढूळ करण्याचे काम सुरू असल्याचे म्हटले.

अजित पवार हे शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचे अनुयायी असून महिलांचा सन्मान करणारे नेते होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पक्षातील काही कार्यकर्ते भाजपच्या पद्धतीचे अनुकरण करत असल्याचे दिसते, जे योग्य नसल्याचेही अतुल लोंढे यांनी नमूद केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे; सुनिल तटकरे यांच्याकडून नियुक्ती जाहीर

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय…

1 तास ago

म्हाडाच्या प्रलंबित प्रकल्पांना गती; मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश

'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर रिक्त घरांची विक्री; शिरूर, खराबवाडी, दापोडी, म्हाळुंगे-इंगळे आणि सांगलीतील प्रकल्पांना…

1 तास ago

एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या महिला तलाठीवर पुन्हा लाचेचा गुन्हा; महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

कोरेगाव भीमा येथे पूर्वीही एसीबीची कारवाई; आता पुण्यात १० लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा, देखरेखीवर…

1 तास ago

शिरुर ग्रामीणचे उपसरपंच संजय शिंदे यांच्या पुढाकाराने बाबुरावनगरमधील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बाबुरावनगर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून निर्माण झालेल्या सांडपाण्याच्या…

1 तास ago

डोकेदुखीचे प्रकार, कारणे, उपाय

डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. प्रत्येक व्यक्तीने डोकेदुखीचा कधीनाकधी अनुभव घेतलेला असेलच. आज बदललेली…

3 तास ago

अश्रू जबरदस्तीने रोखणं पडू शकतं महागात, होऊ शकतं गंभीर नुकसान

वेगवेगळ्या भावना जेव्हा व्यक्तीकडून व्यक्ती होतात तेव्हा अनेकदा डोळ्यातून अश्रू येतात. डोळ्यांमधून अश्रू येणं ही…

3 तास ago