महाराष्ट्र

त्यांची वर्षा बंगल्यावर दीड तास चर्चा, उपराष्ट्रपती पदाबद्दल काय निर्णय होणार…

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी रात्री वर्षा निवासस्थानी दीड तासाहून अधिक वेळ बैठक घेतली. या चर्चेत महायुतीतील समन्वय, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आणि मराठा आरक्षण आंदोलन यावर सविस्तर चर्चा झाली.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून महायुतीत समन्वयाचा अभाव जाणवत होता. मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्ये, भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे वातावरण ढवळून निघाले होते. त्यामुळे आगामी काळात हे प्रकार टाळून महायुती अधिक भक्कम करणे, तिन्ही पक्षांचे मंत्री, आमदार आणि नेत्यांमध्ये संवाद वाढवणे यावर एकमत झाले. लवकरच या निर्णयांची माहिती सर्वांना देण्यात येईल.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतही प्राथमिक चर्चा झाली. शक्य तिथे महायुती करण्याचा प्रयत्न करावा, तर महायुती न झाल्यास आणि त्याचा फायदा विरोधकांना होत असेल तर तीनही पक्ष एकत्र लढण्याचा प्रयत्न करतील, अशी भूमिका बैठकीत घेण्यात आली.

नियुक्त्यांबाबत आग्रह

महामंडळांचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या नियुक्त्या अद्याप झालेल्या नाहीत. या नियुक्त्या स्थानिक निवडणुकांपूर्वी कराव्यात, असा आग्रह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी बैठकीत धरला.

मनोज जरांगे पाटील आंदोलन

मराठा आरक्षणासाठी नेते मनोज जरांगे पाटील हे गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन कसे हाताळावे यावरही तिन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली.

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक

एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा मिळावा यासाठी चर्चा झाली. मात्र विरोधी पक्षातील नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले की, राधाकृष्णन आमच्या विचारसरणीचे नाहीत, त्यामुळे त्यांना समर्थन देणे शक्य नाही.

शरद पवारांची स्पष्ट भूमिका

शरद पवार यांनी सांगितले की, राधाकृष्णन राज्यपाल असताना झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजभवनातच अटक झाली होती. सत्तेचा गैरवापर झाल्याचे हे ढळढळीत उदाहरण आहे, त्यामुळे अशा व्यक्तीसाठी मतांची अपेक्षा करणे योग्य नाही.

उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

सी.पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल असल्याने त्यांना पाठिंबा द्यावा म्हणून फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही फोन केला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, विरोधी पक्षाने उमेदवार दिल्याने आम्हाला त्यांच्यासोबत जाणे अपरिहार्य आहे. तरीदेखील कर्तव्य म्हणून फडणवीसांनी संपर्क साधला होता.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

9 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

13 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

13 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

13 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

13 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

14 तास ago