महाराष्ट्र

वाहतूकदारांनी राज्यव्यापी संप मागे घेतला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची यशस्वी शिष्टाई

मुंबई: अन्यायकारक इ-चलान रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन देत तसेच वाहतूकदारांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच पोलीस व परिवहन विभागाची संयुक्त बैठक बोलावण्यात येणार असल्याची माहिती दिल्यानंतर राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांनी पुकारलेला राज्यव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्यव्यापी वाहतूकदारांच्या संपासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वाहतूकदार संघटनांची शिखर समिती ‘महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटी’च्या सदस्यांशी संवाद साधला.त्यांच्या मागण्यांचा शासन सहानुभूतीपूर्वक विचार करत असून, संप मागे घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत वाहतूकदारांनी संप मागे घेतला आहे.

शासन वाहतूकदारांच्या विविध मागण्यांबाबत संवेदनशील असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. अन्यायकारक पद्धतीने काढण्यात आलेल्या इ-चलानांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. तसेच संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी परिवहन विभाग, पोलीस प्रशासन आणि वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.या आश्वासनानंतर वाहतूकदारांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचेही मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

40 मिनिटे ago

ऑपरेशन टायगर! उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का? सहा खासदारांच्या फुटीची चर्चा, ओमराजे निंबाळकर दिल्लीत

दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील…

50 मिनिटे ago

कौटुंबिक वादातून पोलिस शिपायाची आत्महत्या

चंदगड: नागरदळे (ता. चंदगड) येथे मीरा-भाईंदर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलिस शिपाई दयानंद कृष्णा पाटील (वय…

55 मिनिटे ago

एकल पाल्य विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA) यांच्या वतीने राज्यातील एकल पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना सहाय्य,…

3 तास ago

शाळा-महाविद्यालयांच्या दारातच नशेचा बाजार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…

20 तास ago

दरडग्रस्त भागांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…

21 तास ago