महाराष्ट्र

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मृत प्रवाशांना श्रद्धांजली

मुंबई: अहमदाबाद विमानतळावर आज सकाळी एक गंभीर विमान अपघात घडला असून यात काही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर काही प्रवासी जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मा. श्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मृतांना श्रद्धांजली व्यक्त केली आहें . जखमींना मदत दिली जात आहे ती महत्वाची आहे. त्याचसोबत पुणे व इतर गंतव्यस्थानांकडे प्रवास करणाऱ्या अडकलेल्या प्रवाशांसाठी तातडीने पर्यायी विशेष विमानसेवा वा ईतर प्रवाससेवा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, माहिती वाहिन्यांद्वारे असे स्पष्ट झाले आहे की अहमदाबाद येथून होणारी सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. त्यामुळे पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांकडे जाण्याचे नियोजन असलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

या प्रवाशांमध्ये काहीजण आपत्कालीन वैयक्तिक, सामाजिक किंवा व्यवसायिक कारणांसाठी प्रवास करत होते, याचे भान ठेवून वडोदरा, सुरत अथवा जवळच्या इतर विमानतळांवरून विशेष उड्डाणांची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल, वाहतूक व्यवस्था सुकर होईल आणि प्रशासनावरचा ताण कमी होईल, असेही त्या आपल्या पत्रात म्हणाल्या आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

1 दिवस ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

1 दिवस ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

1 दिवस ago

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…

1 दिवस ago

एनडीए बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन ११ जूनला

षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…

1 दिवस ago

भारतातील आर्थिक-राजकीय संकटे! वास्तव आणि परिणाम विषयावर काँग्रेसचे चर्चासत्र १३ जूनला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…

1 दिवस ago