महाराष्ट्र

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! राज्य सरकारने अखेर भरतीला दिला हिरवा कंदील

मुंबई: राज्यातील हजारो उमेदवारांची वर्षानुवर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! शिक्षकेतर पदभरतीचा मार्ग मोकळा करत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजेच शिक्षकेतरांच्या आयुष्यातील एक नवा वळणबिंदू ठरणार आहे.

कुठल्या पदांची भरती होणार

कनिष्ठ लिपिक

पूर्णवेळ ग्रंथपाल

प्रयोगशाळा सहायक

या पदांची १००% नामनिर्देशनाने भरती करण्यात येणार असून, अनुकंपा नियुक्तीलाही समावेश आहे – जे खरोखरच अनेक कुटुंबांसाठी दिलासादायक आहे.

भरती प्रक्रिया कशी होणार

मान्यताप्राप्त खासगी अंशतः/पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये भरती

विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारे मंजूर पदसंख्या

चतुर्थश्रेणी कर्मचारी पद रद्द, त्याऐवजी शिपाई भत्ता लागू

नियमित असलेले चतुर्थश्रेणी कर्मचारी सेवानिवृत्तीपर्यंत कायम

शालेय शिक्षण विभागाने अधिकृत अध्यादेश काढून ही प्रक्रिया सुरू केली असून, हीच बाब शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे.

शिक्षकांवरील ताण कमी होणार

आजपर्यंत शिक्षकांना प्रशासकीय कामकाज, प्रयोगशाळा व्यवस्थापन, आणि ग्रंथालयाचे व्यवहार पाहावे लागत होते. पण आता या सर्व जबाबदाऱ्या तज्ज्ञ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडे सोपवल्या जातील, त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेतही लक्षणीय वाढ होणार आहे.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’ च्या धर्तीवर शिक्षकेतर पदांचीही भरती केली जाणार आहे. ८०% रिक्त पदांची सरळसेवेने भरती होणार असून, ही भरती पारदर्शकतेने होणार याची हमी सरकारने दिली आहे.

शिवाजी खांडेकर, सरकार्यवाह, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळ यांनी सांगितले की..

२१ वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. आता विभागीय आयुक्तांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की अनुशेष तपासून भरती प्रक्रिया सुरू करा. जवळपास ५,००० उमेदवारांना याचा थेट लाभ मिळणार आहे.

या निर्णयामुळे

हजारो तरुणांना नोकरीची संधी

शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा भार कमी

शैक्षणिक व्यवस्थेत सकारात्मक बदल

कर्मचारी संघटनांकडून स्वागत

शिक्षकेतर पदभरतीचे हे दार उघडले गेले असून, आता अनेक कुटुंबांच्या स्वप्नांना नवे पंख मिळणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

9 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

18 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

18 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

19 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

24 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

24 तास ago