मुंबई: राज्यात सरकारकडून विरोधक आमदारांना निधीवाटपातून डावळले त्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात आवाज उठविला. तसेच विधानसभा व विधानपरिषद आमदारांना असमान निधी वाटप करणे म्हणजे जनतेवर, लोकप्रतिनिधींवर एकप्रकारे अन्याय होत असल्याचे दानवे म्हणाले.
विधानपरिषदेच्या आमदार यांना ४६ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री यांनी माध्यामांना असमान निधी वाटप झालं नसल्याचं सांगितलं मात्र ते सपशेल चुकीचे आहे, असे दानवे यांनी म्हटले. निधी वाटपाची रक्कम ही जनतेच्या करातून वसूल करून दिली जाते. ज्या मतदारसंघात निधी दिला नाही तेथील जनता कर भरत नाही का ? त्यांना विकासाचा अधिकार नाही का? असा सवाल दानवे यांनी उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. असमान निधी वाटप झाले की नाही याबाबत सरकारने खुलासा करावा तसेच सरकारने याबाबत सुस्पष्ट भूमिका मांडली पाहिजे असे दानवे यांनी म्हटले.
सर्व आमदारांना समान निधी वाटपाबाबत धोरण आखणार का असा सवाल देखील दानवे यांनी उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्री यांनी याबाबत कोणावर अन्याय होणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली.
शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू…
शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…
मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…