महाराष्ट्र

विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द; ठाकरे गटाला धक्का, न्यायालयीन लढाईचा इशारा

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९१ मधून निवडून आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केले आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, या निर्णयामुळे त्यांचे नगरसेवक पद तत्काळ रद्द झालेले नाही. संबंधित विषय अद्याप महापालिका सभागृहासमोर आलेला नसल्याने पुढील निर्णय सभागृहातील प्रक्रियेनंतर होणार आहे.

जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर विशाखा राऊत यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्याकडे १९११ आणि १९३७ सालचे पुरावे, मोडी लिपीतील कागदपत्रे तसेच आजोबा-पणजोबांचे पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला.

राऊत यांनी समितीवर दबाव असल्याचा आरोप केला. तसेच हा दबाव शिंदे गटाकडून आणण्यात आल्याचा दावा करत आपण कायदेशीर लढाई लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे गटातील नेते सदा सरवणकर यांनी काही काळापूर्वीच ‘माझी मुलगी नगरसेवक होणार’ असे सांगितले होते, असा आरोपही राऊत यांनी केला.

दरम्यान, मुंबई महापालिकेतील जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर यापूर्वीही काही नगरसेवकांवर कारवाई झाली आहे. प्रभाग क्रमांक १७० मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका बुशरा नदीम मलिक यांचे पद जात पडताळणी समितीच्या निर्णयानंतर रद्द करण्यात आले होते.

तसेच गोवंडीतील प्रभाग क्रमांक १३८ मधून निवडून आलेल्या AIMIMच्या नगरसेविका रोशन शेख यांचीही सदस्यता रद्द करण्यात आली होती. परभणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने २७ एप्रिल २०२६ रोजी त्यांचे ओबीसी जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. त्यानंतर महापालिकेने सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई केली.

आता विशाखा राऊत यांच्या जात प्रमाणपत्राचा विषय महापालिका सभागृहात आल्यानंतर त्यावर काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. न्यायालयीन लढाईमुळे या प्रकरणाला पुढील काळात आणखी राजकीय आणि कायदेशीर वळण मिळण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरद पवारांच्या NDA प्रवेशाच्या चर्चेला उधाण; पृथ्वीराज चव्हाणांचे आवाहन, सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDAसोबत जाणार…

47 मिनिटे ago

उन्हाळ्यात ताक प्यावं पण कधी, दुपारी-रात्री की कधीही?

उन्हाळ्यात शरीराला आतून थंडगार ठेवण्यासाठी आपण आहारात दही - ताकाचा समावेश करतो. या दिवसांत दही…

56 मिनिटे ago

दिवसभरात आपण किती वेळा श्वास घेतो

२४ तासात मनुष्य किती वेळा श्वास घेतो? मानवी शरीर प्रत्यक्षात एखाद्या रहस्याहून कमी नाही. किंबहुना…

59 मिनिटे ago

किडनी स्टोन समस्या आणि काळजी

किडनी स्टोनचा त्रास खूप भयंकर आणि असह्य असतो. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी सोबतच कमी पाणी पिण्याची…

1 तास ago

दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? प्रताप सरनाईकांच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. शिंदे गटाचे…

1 तास ago

पोषण आहारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर कारवाई; आंबेगावात प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न

पुणे : आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्न…

1 तास ago