महाराष्ट्र

रेल्वे स्टेशनवर कुलीच काम करणारा जेव्हा IAS अधिकारी होतो तेव्हा…

मुंबई: कोणीतरी अगदी बरोबर म्हटले आहे की “कोण म्हणतो की यश फक्त नशीब ठरवते, जर तुमची इच्छा शक्ती मजबूत असेल तर कोणतीही गोष्ट तुम्ही मिळवू शकतात. इच्छा शक्तीच्या बळावर अनेकांनी मोठे यश संपादन केलंय. अशाच एका व्यक्तीची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत. ही कथा आहे IAS अधिकारी श्रीनाथ यांची एर्नाकुलम स्टेशनवर हमालाचं काम करणारा हा व्यक्ती आता IAS अधिकारी आहे. आपल्या घराच्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी देशातील सर्वात कठीण UPSC परीक्षा पास केली आणि IAS अधिकारी बनले.

काही वर्षां पूर्वीपर्यंत कुली म्हणून काम करणाऱ्या श्रीनाथने IAS अधिकारी बनून जगापुढे नवा आदर्श ठेवलाय. संकट असली तरी त्याचं संधीत रुपांतर करुन कसं यश मिळवता येईल. हे त्यांनी दाखवून दिलं. अपयशाचे कारण सांगणारे अनेक जण असतात. जर त्यांना सर्व सुख-सुविधा मिळाल्या असत्या तर त्यांना जीवनात नक्कीच यश मिळाले असते, असा त्यांचा विश्वास असतो. मात्र, श्रीनाथ या लोकांपैकी अजिबात नाही. संसाधनं नसताना ही त्याची कधीच तक्रार नव्हती. श्रीनाथ यांनी आपल्या जीवनातील साधनांची कमतरता कधीही आपल्या यशाच्या आड येऊ दिली नाही.

आपत्तीचे संधीत रूपांतर करण्याचा विचार त्यांनी नेहमी केला आणि त्यामुळेच ते त्यांच्या आयुष्यात इतके यशस्वी झाले. कोचिंगशिवाय UPSC पास होणे अवघड असते. देशभरातील लाखो लोकं UPSC परीक्षा देतात आणि त्यांचे नशीब आजमावतात. त्यापैकी फक्त काही टक्केच लोकं ही परीक्षा उत्तीर्ण होतात. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेक विद्यार्थी अनेक वर्षांपासून शहरातील मोठ्या कोचिंग संस्थांमध्ये लाखो रुपये खर्च करतात. परंतु श्रीनाथ सारखे काही उमेदवार आहेत, ज्यांना UPSC कोचिंगसाठी इतके पैसे देणे परवडत नाही, म्हणून ते स्व-अभ्यासाद्वारे ही परीक्षा पास करण्याचा प्रयत्न करतात.

श्रीनाथ मूळचे केरळमधील एर्नाकुलमचे आहेत. एर्नाकुलम रेल्वे स्थानकावर ते कुली म्हणून काम करायचे. रेल्वेच्या मोफत वायफायद्वारे ते इंटरनेटचा वापर करायचे. श्रीनाथकडे UPSC च्या तयारीसाठी कोणत्याही कोचिंग सेंटरची फी भरण्याइतके पैसे नव्हते. अशा परिस्थितीत कोचिंगशिवाय ही कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊ शकणार नाही, असा विचार त्याच्या मनात आला. याच कारणामुळे त्यांनी प्रथम केरळ लोकसेवा आयोग (KPSC) परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. रेल्वे स्थानकावर बसवण्यात आलेल्या मोफत वायफायमुळे त्यांचा अवघड मार्ग सुकर झाला. स्टेशनवर बसवण्यात आलेल्या फ्री वाय-फाय वरून त्यांनी स्मार्ट फोनच्या माध्यमातून अभ्यास सुरू केला.

श्रीनाथ यांच्यासाठी हे मोफत वाय-फाय वरदानापेक्षा कमी नव्हते. तो येथे कुली म्हणून काम करायचा आणि त्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते परीक्षेची तयारी करत असे. खरे समर्पण आणि कठोर परिश्रम घेऊन श्रीनाथने केरळ लोकसेवा आयोग (KPSC) परीक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेत यश मिळाल्यानंतर श्रीनाथच्या मनात विचार आला की ते रेल्वेच्या मोफत वाय-फायच्या मदतीने आणि खऱ्या समर्पणाने यूपीएससीची परीक्षाही देऊ शकतात. IAS झाल्यानंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली आणि तीच परीक्षा उत्तीर्णही केली.

कोणत्याही कोचिंगशिवाय UPSC परीक्षा उत्तीर्ण करुन त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. श्रीनाथ यांनी त्यांच्या जीवनातील साधनांची कमतरता कधीही त्यांच्या यशाच्या मध्ये येऊ दिली नाही. संकटातून मार्ग काढला आणि पुढे आएएस अधिकारी झाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

8 तास ago

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

13 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

13 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

13 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

13 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

15 तास ago