राज्यपाल अभिभाषणावर बोलताना आमदार विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका
नागपूर: राज्यपाल अभिभाषणात महायुती सरकारच्या कामकाजाबाबत अनेक मोठे दावे करण्यात आले आहेत, पण राज्यातील आर्थिक स्थिती पाहता ते फोल ठरण्याची शक्यता आहे. राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे का, असा प्रश्न आ. विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
राज्यपाल अभिभाषणावरील चर्चेचा आज शेवटचा दिवस होता, यावेळी चर्चेत सहभागी असताना विजय वडेट्टीवार यांनी राज्याची आर्थिक स्थिती बिघडली असल्याचा आरोप केला. राज्यपाल यांनी एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होणार असे म्हणाले पण महाराष्ट्रावर ९ लाख कोटींचे कर्ज आहे. दुसरीकडे राज्यातील महिला तरुणी गायब आहेत याचा उल्लेख मात्र राज्यपालांच्या भाषणात नव्हता.
शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार अशी घोषणा महायुतीने जाहीरनाम्यात केली होती, अजूनही सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार हे सांगितलेले नाही. राज्यातील लाडकी बहीण योजनेतील महिलांना २१०० रुपये देणार असे आश्वासन दिले, पण अजूनही त्याच्या अंमलबजावणी बाबत चित्र स्पष्ट नाही.
एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत २८ टक्के वाढ झाली आहे, सामान्यांचे घरचे बजेट कोलमडले आहे अशी टीका आ. विजय वडेट्टीवार यांनी केली.
लाडकी बहिणीचे पैसे बँकेने कर्जासाठी वळवल्याचे उदाहरण समोर आले आहे. अमरावती मधील निर्मला चारपे यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आले, ते बँकेने परस्पर कर्जासाठी वळवण्यात आले. सरकारने मग जे नियम लावले, जीआर काढले त्याला काय अर्थ आहे असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
शिरूर (अरुणकुमार मोटे): द्रुतगती चलन भरूनही महिनाभरात मोजणी पूर्ण होणे अपेक्षित असताना शिरूर तालुक्यात सहा-सहा…
शिरूर (अरुणकुमार मोटे): कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर पत्नीनेच दोन अनोळखी व्यक्तींना पतीवर हल्ला करण्यास प्रवृत्त केल्याची…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर आज बुधवार (दि 29) दुपारी सुमारे १२…
शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका व्यक्तीने पुण्याला काम…
मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…
मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…