मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादी काँग्रेससह राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवरही या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता स्थानिक पातळीवर व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पवार कुटुंबीय दुःखातून सावरत हळूहळू राजकीय जबाबदाऱ्या स्वीकारताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आज सातारा जिल्ह्यातील कराड येथील प्रितीसंगम येथे जाऊन थोर नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत झालेल्या विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
अजित पवार यांच्यावर बारामती येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर त्यांचे अस्थिकलश राज्यभर कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी पाठवण्यात आले आहेत. आज राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अस्थिकलशाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भावुक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दुसरीकडे, बारामती येथे पवार कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी राज्यभरातून कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. यामुळे सुनेत्रा पवार सध्या बारामतीतच मुक्कामाला आहेत.
दरम्यान, उद्याची नियोजित मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलण्यात आली असून या आठवड्यात कोणतीही मंत्रिमंडळ बैठक होणार नाही. अजित पवारांच्या निधनाची पार्श्वभूमी आणि राज्यातील सुरू असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
सुनेत्रा पवार ९ फेब्रुवारीला मंत्रालयात
मंत्रिमंडळाची नियमित बैठक मंगळवारी होत असली तरी उद्याची बैठक रद्द झाल्याने नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित राहणार का, याबाबतची चर्चा संपुष्टात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार असून ९ फेब्रुवारी रोजी त्या प्रथमच मंत्रालयात उपस्थित राहणार आहेत.दरम्यान, आजही बारामतीत अजित पवारांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…
मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…
षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…