पंढरपूर: शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेत मंदिर परिसरातील विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी पावसाळ्यापूर्वी मंदिरातील अपुरी राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या.
मंदिर परिसरात काही ठिकाणी अद्याप पाणी गळती होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत पुरातत्त्व विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले. तसेच वाढत्या भाविकसंख्येचा विचार करून स्वतंत्र विद्युत आराखडा तयार करण्याची गरज व्यक्त केली. महिला भाविकांसाठी हिरकणी कक्षात आसनव्यवस्था व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचनाही त्यांनी मंदिर व्यवस्थापन समितीला दिल्या.
दरम्यान, पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या शिष्टमंडळाने प्रस्तावित मंदिर कॉरिडॉरबाबत डॉ. गोऱ्हे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. कॉरिडॉर प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या नागरिकांच्या घर, जमीन आणि उपजीविकेचा विचार करूनच प्रकल्प राबविण्याची मागणी करण्यात आली.
यावर प्रतिक्रिया देताना डॉ. गोऱ्हे यांनी विकासकामांसोबत स्थानिक नागरिकांच्या हिताचे संरक्षण होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. कॉरिडॉर प्रकल्पामुळे किती घरे, दुकाने व जमीन बाधित होणार याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आवाहन करत नागरिकांच्या अडचणींबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या भेटीदरम्यान मंदिर परिसरातील सुविधा, भाविकांच्या सोयीसुविधा आणि कॉरिडॉर प्रकल्पाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…
पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. चुकीच्या…
गुडघेदुखीचा त्रास हा फारच कॉमन पण तितकाच त्रासदायक देखील ठरतो. गुडघेदुखीची समस्या ही विशेषतः वृद्ध…
ठाणे: ठाणे महापालिका शाळा क्रमांक २३ येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवशी आयोजित शाळा प्रवेशोत्सव…
मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘#ReelSeRealTalk’ या विशेष…
मुंबई: महाराष्ट्र हा संत, समाजसुधारक आणि कष्टकरी शेतकऱ्यांचा प्रदेश आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आजही शेतीच…