मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘#ReelSeRealTalk’ या विशेष सोशल मीडिया रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील युवकांशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर तरुणांनी आपले विचार प्रभावीपणे मांडावेत, यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी दिली.
स्पर्धेसाठी बेरोजगारी, पेपरफुटी आणि महागाई हे तीन विषय निश्चित करण्यात आले असून, सहभागी स्पर्धकांनी यापैकी कोणत्याही एका विषयावर रील तयार करून आपले मत मांडायचे आहे.
स्पर्धकांनी आपली रील १७ जून २०२६ पर्यंत इन्स्टाग्रामवर पोस्ट करावी. रील पोस्ट करताना @mumbaiiyc या अधिकृत हँडलला टॅग करणे तसेच #ReelSeRealTalk हा हॅशटॅग वापरणे बंधनकारक आहे. रीलमधील आवाज आणि व्हिडिओ स्पष्ट असावा तसेच कोणतीही आक्षेपार्ह, अश्लील किंवा अपमानास्पद भाषा वापरू नये, असे आयोजकांनी नमूद केले आहे.
स्पर्धेतील उत्कृष्ट तीन रील्सना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये अशी पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.
देशातील बेरोजगारी, वाढती महागाई आणि पेपरफुटीसारख्या गंभीर प्रश्नांवर युवकांनी आपली भूमिका मांडावी, लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा आणि जनतेच्या प्रश्नांना आवाज द्यावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९०८२२९८०४६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई प्रदेश युवक काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…