महाराष्ट्र

शिंदे मुख्यमंत्री होणार? चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा पूर्णविराम; म्हणाले…

मुंबई: राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडींमुळे मुख्यमंत्रीपदाबाबत विविध चर्चा रंगू लागल्या असतानाच मुख्यमंत्री यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंडखोरी करून यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा सत्तासमीकरणांबाबत चर्चा सुरू झाली होती.

या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना फडणवीस म्हणाले, “ज्या राज्यात बहुमतासाठी १४७ जागांची आवश्यकता असते आणि ज्या पक्षाकडे स्वतःचे १३७ आमदार आहेत, त्या राज्याचा मुख्यमंत्री त्याच पक्षाचा राहील. त्यामुळे अशा चर्चांमुळे ना मी विचलित होतो, ना शिंदे साहेब. प्रत्येकाला स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे, पण वास्तव वेगळे असते.”मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना यानिमित्ताने त्यांनी पूर्णविराम दिल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या खासदारांनी “विकासकामांसाठी निधी मिळत नसल्यामुळे आम्ही सत्ताधारी पक्षात प्रवेश केला,” असे स्पष्टीकरण दिले होते. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, निधी हे अनेक कारणांपैकी एक कारण असू शकते. विकास प्रकल्प, सामाजिक प्रश्न, सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील भूमिका आणि नेतृत्वावरील विश्वास यांचाही निर्णयावर परिणाम होत असतो.”राजकारणात प्रत्येकजण आपल्या राजकीय भविष्यासाठी निर्णय घेत असतो. नेतृत्व आपले भविष्य सुरक्षित करू शकत नाही, अशी भावना निर्माण झाली तर पक्षांतर होणे स्वाभाविक असते,” असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष : अचानक मिळेल शुभ संकेत! आज एखाद्या कामात अनपेक्षितपणे चांगली प्रगती होऊ शकते. तुमच्या…

2 तास ago

हातगाडीपासून महापालिकेच्या महसुलापर्यंत; Street Economy ची ताकद किती मोठी?

मुंबई : भारताची अर्थव्यवस्था केवळ मोठ्या उद्योगांमध्ये, कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये किंवा शेअर बाजारात दिसत नाही. देशाच्या…

2 तास ago

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्राचा दबदबा; तावडेंना सरचिटणीसपद, भारती पवार उपाध्यक्ष

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या…

17 तास ago

‘राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला’; सुजय विखें

अहिल्यानगर : अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कामाला…

17 तास ago

लाडकी बहीण विरुद्ध लाडली बहना; रक्षाबंधनानिमित्त कोणत्या राज्यातील महिलांना किती रक्कम?

मुंबई : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे हप्ते…

18 तास ago

फडणवीसांची अचानक दिल्लीवारी; मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडींना वेग आलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

18 तास ago