शिंदे मुख्यमंत्री होणार? चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा पूर्णविराम; म्हणाले…

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडींमुळे मुख्यमंत्रीपदाबाबत विविध चर्चा रंगू लागल्या असतानाच मुख्यमंत्री यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंडखोरी करून यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा सत्तासमीकरणांबाबत चर्चा सुरू झाली होती.

या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना फडणवीस म्हणाले, “ज्या राज्यात बहुमतासाठी १४७ जागांची आवश्यकता असते आणि ज्या पक्षाकडे स्वतःचे १३७ आमदार आहेत, त्या राज्याचा मुख्यमंत्री त्याच पक्षाचा राहील. त्यामुळे अशा चर्चांमुळे ना मी विचलित होतो, ना शिंदे साहेब. प्रत्येकाला स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे, पण वास्तव वेगळे असते.”मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना यानिमित्ताने त्यांनी पूर्णविराम दिल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या खासदारांनी “विकासकामांसाठी निधी मिळत नसल्यामुळे आम्ही सत्ताधारी पक्षात प्रवेश केला,” असे स्पष्टीकरण दिले होते. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, निधी हे अनेक कारणांपैकी एक कारण असू शकते. विकास प्रकल्प, सामाजिक प्रश्न, सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील भूमिका आणि नेतृत्वावरील विश्वास यांचाही निर्णयावर परिणाम होत असतो.”राजकारणात प्रत्येकजण आपल्या राजकीय भविष्यासाठी निर्णय घेत असतो. नेतृत्व आपले भविष्य सुरक्षित करू शकत नाही, अशी भावना निर्माण झाली तर पक्षांतर होणे स्वाभाविक असते,” असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत