महाराष्ट्र

महिला आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, राजकारण सोडण्याचा निर्णय

पंजाब: आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये धक्का बसला आहे. पंजाबमधील खरार विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या आमदार अनमोल गगन मान यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.

पंजाब विधानसभा अध्यक्षांना अनमोल गगन मान यांनी राजीनामा पाठवला आहे. त्यांचा राजीनामा अध्यक्षांनी स्वीकारल्यास पंजाबमध्ये आणखी एक पोटनिवडणूक होईल असे म्हटले जात आहे.

‘मी दु:खी मनाने राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सभापतींना मी माझा राजीनामा पाठवला आहे, त्यांनी तो स्वीकारावा अशी माझी विनंती आहे. आम आदमी पक्षासोबत माझ्या शुभेच्छा नेहमी असतील. पंजाब सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेल अशी मला आशा आहे’, असे अनमोल गगन मान यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

अनमोल गगन मान या प्रसिद्ध पंजाबी गायिका आणि अभिनेत्री आहेत. २०२० मध्ये त्या आम आदमी पक्षामध्ये सहभागी झाल्या होत्या. २०२२ च्या विधानसभेच्या निवडणूकीत त्यांनी पक्षाने तिकीट दिले होते. मोहालीतील खरार विधानसभा मतदारसंघातून अनमोल गगन मान आमदार म्हणून निवडून आल्या. त्यावेळी आप पक्षाच्या त्या सर्वात तरुण आमदार ठरल्या होत्या. त्यांच्याकडे पर्यटन आणि संस्कृती विभागाची जबाबदारी देण्यात आली होती.

अनमोल गगन मान यांचा जन्म १९९० मध्ये मानसा येथे झाला. चंडीगडमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रात काम केले. त्यानंतर अनमोल संगीत क्षेत्राकडे वळल्या. अनमोल गगन मान यांनी १६ जून २०२४ रोजी वकील शाहबाज सिंह सोही यांच्याशी लग्न केले. शाहबाज सिंह हे पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयामध्ये वकील आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

16 तास ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

18 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

22 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

23 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

23 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

23 तास ago