मुंबई: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून, या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महायुतीला या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळाले असून, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
या निकालांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवला आहे. १२ जिल्हा परिषदांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून महायुतीची सत्ता येणार हे आता स्पष्ट झाले आहे. ६० ठिकाणी भाजप पहिल्या क्रमांकावर आहे, तर शिवसेना दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस एका ठिकाणी नंबर वन पक्ष आहे.”
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, “अतिशय सकारात्मक कल समोर आला आहे. भाजपने २०१७ चा स्वतःचा विक्रम मोडला आहे. २०१७ मध्ये भाजपला १४१ जागा मिळाल्या होत्या, तर यंदा निकाल पूर्ण होईपर्यंत २३६ जागा मिळाल्या आहेत.”
निवडणूक काळातील परिस्थितीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले, “निवडणूक दरम्यान अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे मी स्वतः प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता.”
महायुतीतील सर्व सहकारी पक्षांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विशेष कौतुक केले. “राज्यातील जनतेचे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम आणि योग्य कारभार करू,” असे आश्वासनही त्यांनी दिले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भातील प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “सरसंघचालक जे विधान करतात त्यावर आम्ही भाष्य करत नाही. त्यांची वक्तव्ये दिशादर्शक असतात. विरोधी पक्ष केवळ माध्यमांपुरता मर्यादित आहे, जनतेमध्ये नाही. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल.”
दरम्यान, ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने जिल्हा परिषदांमध्ये पहिला क्रमांक कायम राखला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही १०० हून अधिक जागा जिंकत दमदार कामगिरी केली आहे.
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…
मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…
मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…
मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…
महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…