महाराष्ट्र

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षणाबाबत मोठी बातमी…

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती

मुंबई : राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात आज (मंगळवार) झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीनंतर राज्य निवडणुक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर पडणार आहेत. राज्य निवडणुक आयोगाने यापूर्वीच जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा बदल करण्यात आला आहे. शिवाय आता एका आठवड्यानंतर यावर सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाबद्दल स्थानिक पातळीवर पत्र व्यवहार झाला होता. त्याअनुशंगाने राज्य निवडणुक आयोगाने 5 जुलै रोजीच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिला होता. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार आज सुनावणी दरम्यान कोर्टाने हे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणुक प्रक्रियेला काही कालावधीसाठी ब्रेक लागला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण सोडत कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने राज्य निवडणुक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाबद्दल पुढील सुवानीनंतर निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत अधिकृत तारिख जाहीर झालेली नाहीतर न्यायालयाच्या पुढील सुनावणीनंतर काय निर्णय घ्यायचा हे ठरवले जाणार आहे. पुढील सुनावणी ही आठवड्याभरानंतर होणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…

9 मिनिटे ago

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

2 तास ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

8 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

16 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

1 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

1 दिवस ago