Categories: राजकीय

टाकळी हाजी गटात होणार चौरंगी लढत?

सविंदणेः टाकळी हाजी-कवठे येमाई जिल्हा परिषद गटातील बदल झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. कवठे येमाई पंचायत समिती गणातील पूर्वेकडील आमदाबाद गाव कारेगाव गणात गेले असून, टाकळी हाजी गणातील चांडोहचा कवठे येमाई गणात नव्याने समावेश करण्यात आला आहे.

अनेक वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या कवठे येमाई-टाकळी हाजी गटात राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या वाढत चालली असून दोन वर्षांपासून कार्यकर्ते तयारीत आहेत. वाढदिवस, लग्न समारंभ, दशक्रिया अशा सगळ्याच कार्यक्रमांना हजेरी लावून कार्यकर्ते स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्हा परिषदेचे दावेदार फक्त आम्हीच अशा प्रकारे जनतेवर राज्य करू पाहणारे प्रत्येक उमेदवार जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य झाल्याच्या आविर्भावात वागत आहेत. स्वतःची प्रसिध्दी स्वतः करून घेण्यासाठी प्रत्येक घडामोडींची सोशल मीडिया द्वारे प्रसिध्दी केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परीषद सदस्य पदासाठी सुनिता गावडे, राजेंद्र गावडे, दामुशेठ घोडे, भाजपाकडून सावित्राशेठ थोरात, शिवसेनेकडून डॉ. सुभाष पोकळे, शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे या चारही पक्षाचे कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले असून, जोरदार प्रचार यंत्रणा राबवत आहे. पंचायत समिती सदस्य पदासाठी फोडाफोडीचे तसेच उमेदवारावर माघार घेण्यासाठी दबाव आणू शकतात या कारणाने नावे गुपित ठेवली जात आहे. त्यामुळे या गटात राजकिय वातावरण चांगलेच तापले असून आता चौरंगी लढत होणार का? तसेच या चौरंगी लढतीमुळे मतदारांपुढे डोकेदुखी वाढणार असून मते कोणाच्या पारडयात जाणार याकडे लक्ष लागणार आहे. तसेच राष्ट्रवादी कॉग्रेसकडून अनेक जण इच्छुक असून कोणाला उमेदवारी मिळणार, उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी होणार का? हे आता येणारा काळच ठरवणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

1 तास ago

जन्मभूमीतून कर्मभूमीकडे! गोदा ते नर्मदा जलयात्रा; नारीशक्ती आणि विकासाचा नवा महामंत्र

अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…

2 तास ago

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानावरून काँग्रेस आक्रमक

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश…

2 तास ago

गोंधळ’ चित्रपटाचा प्रयोग हाऊसफुल

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत शुक्रवारी…

2 तास ago

बटाटे खाऊन वजन वाढत असं तुम्हालाही वाटतं का जाणून घ्या…

वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. कुणी एक्सरसाईज करतं तर कुणी आहारात बदल…

3 तास ago

च्युइंगम खाल्ल्याने खरंच चेहरा बारीक होतो का जाणून घ्या…

लोकांना नेहमीच त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होत असतात. तसेच त्याबाबत काही गैरसमजही लोकांमध्ये असतात. कधी सांगितलं…

3 तास ago