राजकीय

देवेंद्र फडणवीस तुम्हाला पळता भुई थोडी होईल; उद्धव ठाकरे

मुंबई: संपूर्ण महाराष्ट्र जागा झाला आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला मर्द लागतो, तो मर्द आपल्या शिवसेनेत आहे. भ्रष्टाचाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. पण यांना डोकं असेल तर ना, यांना नुसते पाय आहेत सुरत आणि गुवाहाटीला पळून जायला. असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

दिल्लीमध्ये इंडिया आघाडीतर्फे विरोधी खासदारांचा मोर्चा निघाला आहे. तो पोलिसांनी अडवल्याचं समजतं आहे. या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र भ्रष्टाचाऱ्याच्या पहिल्या रांगेत बसवला आणि विकासाच्या रांगेत शेवटी बसवला आहे. यांचा कारभार जनताभिमुख नाही तर पैसे गिळणाऱ्याचं यांचं तोंड आहे. कुणी डान्सबार चालवतंय, कुणी बॅगा घेऊन बसलंय. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला काही वेळ नाही. देवेंद्र फडणवीस भाजपाची परंपरा पुढे चालवणारे आहेत असं वाटलं होतं. पण त्यांनी गैरवर्तन करणाऱ्यांना फक्त समज देऊन सोडून दिलं आहे. भ्रष्टाचाऱ्यांविरोधात पुरावे असूनही सोडून देणार असाल तर मग धनकड कुठे आहेत याचंही उत्तर द्या. असंही उद्धव ठाकरे म्हणाले. धनकड यांचा राजीनामा का घेतला? हे कळलेलंच नाही. त्यांना तडकाफडकी काढून गायब केलं. धनकड यांना समज का दिली नाही? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.

चीनचा पॅटर्न भारतात राबवला जातो आहे

चीनमध्ये कळत किंवा नकळत सरकारमध्ये कुणी काही बोललं तर तो माणूस गायब होतो. उपराष्ट्रपती आहेत कुठे? ते तरी दाखवा. त्यांची प्रकृती बिघडली असेल तर ते कुठल्या रुग्णालयात आहेत? की तुम्ही त्यांचं ऑपरेशन केलं? याचं उत्तर द्या असंही उद्धव ठाकरे म्हणाले. आज मी सगळ्यांना म्हणजेच सगळ्या शिवसैनिकांना सांगतोय मोदींनी जशी चाय पे चर्चा केली होती तशी तुम्ही आता लोकांशी चर्चा करा. आता भ्रष्टाचार पे चर्चा करा. भ्रष्टाचारी मंत्री जोपर्यंत हाकलले जात नाहीत तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही.

मला देवेंद्र फडणवीस यांची कीव येते आहे; उद्धव ठाकरे

मला देवेंद्र फडणवीस यांची कीव येते, तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे, दिल्लीत तुमचे बाप बसले आहेत तरीही भ्रष्टाचाऱ्यांना तुम्ही काढून टाकत नाही? देवेंद्र फडणवीस यांनी काही भ्रष्टाचार केला नाहीये असं गृहीत धरु मग तुम्ही भ्रष्ट लोकांवर पांघरुण का घालता? भाजपा म्हणजे भ्रष्टाचारी जनता पक्ष त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाही. तसं भ्रष्ट मंत्र्यांच्या जागीही कुणी मिळत नाही का? देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं मला या लोकांना काढायचं आहे पण सहन होत नाही आणि सांगता येत नाही असा दबाव आहे. आमचं तर म्हणणं आहे की झुगारुन द्या सगळा दबाव. देवेंद्र फडणवीस हे चीफ मिनिस्टर नाहीत तर थीफ मिनिस्टर आहेत असं काँग्रेसने त्यांना म्हटलं आहे. चांगला शब्द दिला आहे. देवेंद्र फडणवीसांमध्ये थोडासा जरी स्वाभिमान असेल तर वरचा दबाव पाहू नका. कारण इथला दबाव वाढला तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…

22 तास ago

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

2 दिवस ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

2 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

2 दिवस ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

2 दिवस ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

2 दिवस ago