मुंबई: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुकांसदर्भात केलेल्या आरोपांमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांसह देशात इतरही ठिकाणी मतांची चोरी करण्यात आली, असा मोठा आरोप त्यांनी केला आहे.
हे आरोप करताना त्यांनी अनेक पुरावेही सादर केले आहेत. राहुल गांधींच्या या आरोपांनी आता निविडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील आज (11 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग आणि निवडणुकीविषयी गंभीर दावे केले आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच कॉमेडियन कुणाल कामरा याने एक चार शब्दांचे ट्वीट करून देशात खळबळ उडवून दिली आहे.
कुणाल कामरा याने नेमकं काय म्हटलय
कुणाल कामरा यानेदेखील आपल्या ट्विटमध्ये निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय. गेल्या काही दिवसांपासून तो देशातील निवडणूक घेण्याची प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाची भूमिका यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय. याआधी त्याने 7 ऑगस्ट रोजी एक ट्विट् करून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची द सिलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणत खिल्ली उडवली होती. आता त्याने अवघ्या चार शब्दांचे ट्वीट करत पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. त्याने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय निवडणूक आयोगाला थेट इलेक्शन कॉम्प्रोमाईज ऑफ इंडिया असे म्हणत या स्वायत्त संस्थेची निर्भर्त्सना केली आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…