राजकीय

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अनेक पक्षांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला जाहीर पाठिंबा

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) आणि ब्लॅक पँथर या पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांची परंपरा जपणाऱ्या या पक्षाला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सर्व सहकारी पक्षांचे आभार मानले. भविष्यातील सर्व निवडणुका एकत्रितपणे लढवून आघाडी अधिक मजबूत करण्याचा विश्वासही यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.

यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व संघटक सचिव विकास लवांडे, मुंबई विभागीय निवडणूक प्रभारी अध्यक्ष मिलिंद कांबळे, सहअध्यक्ष सोहेल सुभेदार, प्रदेश प्रवक्ते महेश चव्हाण, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आयु. बाळासाहेब पवार उपस्थित होते.

शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की, येणाऱ्या निवडणुका या जनतेच्या आहेत. त्यामुळे ठराविक अजेंड्यावर आधारित लढत देण्यात येणार आहे. विशेषतः मुंबईच्या निवडणुकीला अत्यंत महत्त्व असून, प्रचारासाठी इतर राज्यांतील नेत्यांना बोलावले जात असल्याने प्रांतवाद, भाषिक वादानंतर आता धर्मवादाचा मुद्दा पुढे येतो आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काही पक्ष परप्रांतीय नेत्यांच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्याचे मनसुबे आखत असून, त्यामुळे महाराष्ट्र आणि मुंबईच्या विभाजनाची शंका निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र राज्यात राहणाऱ्या सर्व जनतेला एकत्र घेऊनच मुंबईची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले असे शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले.

शशिकांत शिंदे म्हणाले की, पक्षातून कोणी बाहेर पडल्यास त्याचा फारसा परिणाम होत नाही. रिक्त झालेल्या जागा भरून निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न राहील. पक्ष सोडून जाण्यापासून कुणालाही कधी रोखले नाही. जे गेले ते त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचेही शशिकांत शिंदे यांनी सांगितले आहे.

शशिकांत शिंदे म्हणाले की, मुंबईला एकूण ११ जागा मिळाल्या आहेत. त्यातील ४ जागा आम्ही स्वबळावर लढत आहोत. काही जण उमेदवारी मिळाली नाही म्हणून पक्ष सोडून गेले आहेत. अनेक ताकदीच्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची होती पण वस्तुस्थिती पाहता आम्ही देऊ शकलो नाही. अशी खंत यावेळी बोलताना शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, वचिंतसोबत कोल्हापूर, जळगाव, सांगली, अमरावती, तीन चार ठिकणी आम्ही एकत्र निवडणुक लढवणार आहोत. आमच्याकडे बंडखोरी झालीच नाही. माघार घेतल्यानंतर निवडणुकीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. असे शशिकांत शिंदे म्हणाले.

शशिकांत शिंदे म्हणाले की, दरम्यान, मुंबईत मराठा महापौर होणार अशी वक्तव्ये सध्या होत असली तरी आजचे राजकारण हे धर्म आणि भाषेच्या मुद्द्यांवर चालली आहे. ही एक राजकीय रणनीती आहे. प्रत्येक पक्षाने आपली स्पष्ट भूमिका मांडावी, असे आवाहनही यावेळी शशिकांत शिंदे यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

20 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

20 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

20 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

20 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

21 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

21 तास ago