जालना: देशाच्या सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला ‘तुम्ही कोण आहात’ असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे त्यांनी आधी त्या प्रश्नाचे उत्तर दयावे, त्यानंतर इतर प्रश्नांचा निकाल लागेल. शिवसेनेचा आणि निवडणुकांचा धसका घेतल्याने त्यांनी रिट याचिका दाखल केली असल्याची सडकून टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर केली.
जालना येथे ते माध्यमांशी बोलत होते. याशिवाय शिंदे गटाने शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याची मागणी सुप्रीम कोर्टात केलीय, त्यावर बोलताना दानवे म्हणाले की, याचा अर्थ त्यांना आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याची भीती वाटतेय. शिवाजी पार्क सरकारला ब्लॉक करता येणार नाही राज्यात लोकशाही आहे, सरकारीची दादागिरी चालणार नाही तर जनतेची दादागिरी चालते. गेल्या ५६ वर्षांपासून सातत्याने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत आहे.
यावेळी देखील शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत सरकारला जनतेच्या मतानुसार वागावं लागतं. लोकशाहीत दादागिरी करुन चालत नाही, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर थेट हल्लाबोल केला आहे. संभाजीनगर येथे आयकर विभागाने टाकलेल्या धाडीवर बोलताना दानवे म्हणाले की, जनता भाजपला बंधन नाही, त्यामुळे ईडी, सीबीआय, आयकर सारख्या शासकीय यंत्रणांचा वापर करुन दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे.
थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…
केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…
मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…
मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…