मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या सहा खासदारांच्या पक्षांतराचा मुद्दा आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्यासह सहा खासदारांविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी या सहा खासदारांच्या पक्षांतराला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान संबंधित खासदारांना नोटीस बजावण्यात आल्याने त्यांच्या पक्षांतराच्या वैधतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
काही दिवसांपूर्वी या सहा खासदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला होता. मात्र, आता याच पक्षांतराला सर्वोच्च न्यायालयात आव्हान मिळाल्याने शिंदे गटासमोरील कायदेशीर पेच वाढण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसमुळे या सहा खासदारांच्या पक्षांतराबाबत पुढील न्यायालयीन प्रक्रिया काय वळण घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या खासदारांचे पक्षांतर कायदेशीरदृष्ट्या टिकणार का, याबाबतच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.
शरीराला आपलं काम करण्यासाठी आवश्यक पोषक तत्वांची गरज असते. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांसोबतच मेंदुला सुद्धा पोषक…
थकवा हा शारीरिक किंवा मानसिक स्वरूपाचा असू शकतो. जर सतत थकवा जाणवत असेल तर त्यामागे…
मुंबई: भाजपा सरकारच्या काळात परीक्षांना पेपरफुटीचे ग्रहण लागले असून सरकार एकही परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही.…
मुंबई: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी शेकडो रुग्णांना कोट्यवधी रुपयांची मदत मिळते, ही निश्चितच…
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या नवनियुक्त अध्यक्षपदाची सूत्रे आमदार साजीद खान पठाण १९ ऑगस्ट…
मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असली, तरी मेट्रो परिसरातील जागा अद्याप संबंधित…