राजकीय

पक्षाने मला बोलायला सांगितलं होत पण नेमक काय झालं?

मुंबई: दोन वर्षाच्या कालावधीनंतर दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. त्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भाषणाची संधी हुकल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होत. त्यानंतर आता स्वतः अजित पवार यांनी घडलेल्या प्रकारावर भाष्य करत पक्षावर नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी याबाबतचा खुलासा केला. दिल्लीत घडलेल्या प्रकारानंतर तुम्ही नाराज आहेत का ? असा सवाल माध्यमकर्मीनी दादांना विचारला असता ते म्हणाले, “मी कशाला नाराज होऊ, नाराज व्हायचं कारण काय ? सकाळी १० वाजेपासून बसल्यानंतर तुम्हाला दीड दोनला वॉशरुमला जावस वाटणार नाही का ? मी सगळ्या कार्यकर्त्यांना भेटत होतो. मी कशाला नाराज होऊ ? पक्षाने मला उपमुख्यमंत्रीपद दिल, पक्षाने मला विरोधीपक्षनेते पद दिल, आज मी जबाबदारीनं पक्षाचं काम करतोय नाराज व्हायचं कारण काय ? आम्ही सगळ्यांनी एकमताने पवार साहेबांचं नाव राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केलं असल्याचे देखील पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

यावेळी नेमकं काय म्हणाले अजित पवार 

“मला अजिबात पक्ष डावलत नाही. पक्षाने मला बोलायला सांगितलं होत, पण मीच तुम्हाला सांगतो की बराच कार्यक्रम लांबला होता ३ वाजेपर्यंत कोणी जेवलेलं नव्हतं पवार साहेबांचं मार्गदर्शन होत आणि अध्यक्षीय भाषणाची आम्ही वाट पाहत होतो. कार्यकर्ते देखील नाराज नसल्याचं स्पष्ट मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…

1 दिवस ago

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

1 दिवस ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

2 दिवस ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

2 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

2 दिवस ago